शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पूर्वेत सूर्योदय कुणाचा?

By admin | Updated: October 16, 2014 00:56 IST

पूर्व नागपूर क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी सकाळी ७ वाजताच मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. परंतु यानंतर लगेच सुमारे ९ वाजताच्या सुमारास

नागपूर : पूर्व नागपूर क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी सकाळी ७ वाजताच मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. परंतु यानंतर लगेच सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक धो धो पाऊस सुरू झाला. यामुळे मतदान केंद्रावरील यंत्रणेसह मतदारांची एकच तारांबळ उडाली. अनेकांनी रांगा तोडून मतदान केंद्राच्या व्हरांड्यात आसरा घेतला. परंतु त्याचवेळी काही मतदार पावसात भिजत मतदानाचा हक्क बजावत होते. त्यांचा तो उत्साह पाहण्यासारखा होता. दुसरीकडे विविध पक्षांच्या बुथ कार्यकर्त्यांनाही या पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला. त्यांना आपले सर्व साहित्य गुंडाळून मिळेल तेथे आसरा घ्यावा लागला. यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत फारच कमी मतदान झाले होते. या क्षेत्रातील बहुतांश मतदान केंद्रावर केवळ ६ ते ७ टक्के मतदान झाले होते. मात्र पाऊस बंद होताच दुपारी १२ वाजतानंतर मतदारांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आणि मतदान केंद्राबाहेर पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या. यात तरुण-तरुणींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. तरुण-तरुणी गटागटाने येऊन मतदानाचा हक्क बजावत होते. याशिवाय महिला, पुरुष व वृद्धांनीही मतदान करून आपला हक्क बजावला. मात्र त्याचवेळी मतदार यादीत नावे न सापडणाऱ्या अनेकांचा हिरमोड होऊन त्यांना मतदान न करताच परतावे लागले. दुसरीकडे पावसामुळे अनेक मतदान केंद्रांवर चिखल झाला होता. नंदनवन परिसरातील लिटिल रोज कॉन्व्हेंटमध्ये पावसाचे चांगलेच पाणी साचले होते. येथील सर्व मतदान खोल्यांसमोर चिखल झाला होता. मात्र लोकांमधील उत्साह त्या चिखलाची कोणतीही पर्वा न करता ते आपला मतदानाचा हक्क बजावीत होते. त्याचवेळी या मतदार क्षेत्रात हसनबागमधील कादरिया उर्दू हायस्कूलसह मिनीमातानगरमधील हिंदी प्राथमिक शाळा, कळमना परिसरातील भारतनगर येथील गायत्री प्राथमिक शाळा व याच परिसरातील नागपुरी स्कूलमधील संवेदनशील मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.नंदनवन : पावसात चर्चा नंदनवन परिसरातील लिटिल रोज कॉन्व्हेंट, ज्ञान विकास विद्यालय व वूमेन्स विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांनी चांगली गर्दी केली होती. मतदारांच्या केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंतु पाऊस सुरू होताच सर्वत्र एकच धावपळ माजली. अनेक जण मतदान आटोपल्यानंतरही पावसामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे शाळांच्या व्हरांड्यात चांगलीच गर्दी झाली होती. मात्र त्या गर्दीत मतदानाचा उत्साह झळकत होता. कोणता उमेदवार चांगला, कोणता वाईट अशा चर्चा रंगल्या होत्या.यात प्रत्येक जण वेगवेगळ्या उमेदवाराविषयी आपले मत व भावना व्यक्त करीत होते. पावसाने जणू त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली होती. परंतु या चर्चेत सहभागी होणारा हा तरुणवर्ग दिसून येत होता. एका मतदार क्षेत्रापासून सुरू झालेली ही चर्चा काहीच वेळात थेट राज्याचा मुख्यमंत्री व केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत होते. मग यात महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण राहील, कोणत्या पक्षाची सत्ता येईल. असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर काही जण तेवढ्याच वेगवेगळ्या पद्घतीने त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते. कळमना : मतदार यादीत नाव शोधण्यासाठी वणवण लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही अनेकांना मतदार यादीतील घोळाचा फटका सहन करावा लागला. यात कुणाचे यादीतून नावच गहाळ झाले होते, तर कुणाच्या नावात चुका होत्या. कळमना परिसरातील गंगाराम बिसन गंगाबाईदर व प्रेमवती गंगाराम गंगाबार्इंदर या दाम्पत्याने तीन मतदान केंद्रावरील मतदार याद्या चाळून काढल्या, परंतु त्यांचे नाव कुठेही मिळाले नाही. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मतदान कार्ड होते. असे असताना मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे हताश होऊ न शेवटी मतदान न करताच ते घरी परत निघून गेले. या दाम्पत्याच्या मते, त्यांनी नुकत्याच काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. मग असे असताना अचानक काहीच महिन्यात मतदार यादीतून त्यांचे नाव कुठे गायब झाले? असाही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. दुसरीकडे नंदनवन परिसरातील ८० वर्षीय पंजाबराव मोटघरे आपल्या मुलासह ज्ञानविकास शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.परंतु त्यांनीही मतदार यादीत आपले नाव शोधले असता त्यांना ते दिसून आले नाही. त्याच वेळी त्यांची पत्नी व सुनेचे मतदार यादीत नाव होते. मतदार यादीतील या घोळावर मोटघरे यांनी तीव्र संताप व्यक्त करून तेही मतदान न करताच परत निघून गेले. अशाप्रकारे या क्षेत्रातील अनेक मतदान केंद्रावर मतदार यादीतील हा घोळ निदर्शनास आला. यामुळे इच्छा असूनही अनेकांना मतदान करता आले नाही. काही मतदारांना मतदार यादीत नाव असूनही त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने मतदान करता आले नाही. या घोळामुळे अनेक मतदार हातात मतदान कार्ड व बुथवरून देण्यात आलेली चिठ्ठी घेऊ न मतदान केंद्रावर वणवण भटकताना दिसून येत होते. कुणी त्यांना एका खोलीत पाठवीत होते, तेथे पोहोचताच तेथील कर्मचारी दुसऱ्या खोलीकडे बोट दाखवीत होते. परंतु त्यांना कुणीही योग्य मार्गदर्शन करीत नव्हते. त्यामुळे त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. यात अनेक जण कंटाळून मतदान न करताच घरी परत निघून जातानाही दिसून आले.