शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळा वाढल्या; पाण्याने तळ गाठला

By admin | Updated: May 5, 2014 00:32 IST

मे महिन्याची सुरुवात होताच पाण्याची पातळी खालावत चालली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे सुरु आहे.

खडसंगी : मे महिन्याची सुरुवात होताच पाण्याची पातळी खालावत चालली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे सुरु आहे. यावर्षी पाऊस जास्त आल्याने मागच्या वर्षापेक्षा पाणी टंचाईचा सामना जास्त प्रमाणात बसणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र स्थिती उलट आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने तलाव, विहिरी, कूपनलिकेतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यासह अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. चिमूर पंचायत समिती अंतर्गत ९८ ग्रामपंचायती असून २६३ गावांचा समावेश आहे. या गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या नळ योजना, विंधन विहिरी, हातपंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात २७९ विंधन विहिरी, ८२५ हातपंप, तर पॉवरपंपाद्वारे या गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ही व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे नवीन विंधन विहिरी व हातपंपाची बºयाच गावात आवश्यकता भासत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून उष्णता वाढत आहे. उष्णता वाढल्याने इरई धरण, चंदई नाला, चारगाव धरण, घोडाझरी तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. (वार्ताहर)