शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

कोरोना काळातदेखील ‘आयआयएम’च्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचा कल हा ‘बँकिंग’, वित्त, विमा, तसेच ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’साठी काम करणाऱ्या कंपन्यांकडे जास्त राहिला. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.

‘आयआयएम-नागपूरच्या’ सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. यंदा २१२ विद्यार्थी ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेला सामोरे गेले. यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा येथे ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत शंभरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या कंपन्या आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा सर्वात जास्त ‘स्टायपेन्ड’ २.५ लाख इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे, तर सरासरी ‘स्टायपेन्ड’ ६० हजार ९५३ इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात १२.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी ‘फिनटेक’, फार्मा कंपन्या, तसेच ‘ई-कॉमर्स’लादेखील प्राधान्य दिले आहे.

‘लॉजिस्टिक हब’ला मिळणार बळ

‘आयआयएम’मधील अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ‘समर इंटर्नशिप’ करणे अनिवार्य असते. ‘आयआयएम’चा दर्जा लक्षात घेता नामांकित कंपन्यांकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. ‘आयटी कन्सल्टिंग’, ‘लॉजिस्टिक्स’, ‘रिटेल’, ‘एफएमसीजी’, ‘मीडिया’, ‘बँकिंग’ इत्यादी क्षेत्रातील कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नागपूर उदयाला येत असून, या क्षेत्रातील कंपन्यादेखील ‘आयआयएम’मध्ये आल्या होत्या.

उद्योग क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या काळातदेखील आयआयएम-नागपूरला उद्योग क्षेत्राने पसंती दिली आहे. यंदा आव्हानांत वाढ झाली होती. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना जास्त शिकायला मिळाले. शिकतानाच उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळाला, तर दर्जेदार व कुशल विद्यार्थी घडतात. यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक वातावरणनिर्मितीदेखील होते. यंदा ‘आयआयएम-नागपूर’ने ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत दर्जेदार कंपन्या सहभागी झाल्या. यातूनच संस्थेचा दर्जा वाढत असल्याचे दिसून येते, असे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले.