शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

तक्रारीच्या विलंबामुळे खटला निरर्थक होत नाही; उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:06 IST

विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली.पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्यामुळे संपूर्ण खटला अविश्वसनीय ठरवून फेटाळण्यात यावा, अशी विनंती आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने हा युक्तिवाद खोडून काढला. एफआयआर नोंदविण्यास विलंब झाल्यामुळे संपूर्ण खटला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिला जाऊ शकत नाही. अशा प्रकरणामध्ये आरोपीला फसविण्यासाठी जाणिवपूर्वक एफआयआर नोंदविण्यास विलंब करण्यात आला काय? हे न्यायालयाला तपासून पाहावे लागते, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.सदर प्रकरणात एफआयआर नोंदविण्यासाठी जाणिवपूर्वक विलंब करण्यात आला नाही, असा निष्कर्ष निर्णयात नोंदविण्यात आला. आरोपीने २३ व २४ आॅगस्ट २०१५ रोजी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला पहिल्यांदा २६ आॅगस्ट रोजी गुप्तांगात त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिने मध्यरात्री १२ वाजता आईला आरोपीच्या निंदनीय कृत्याची माहिती दिली.परिणामी, आईने २७ आॅगस्ट रोजी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला, असे उच्च न्यायालयाने आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळताना सांगितले.

असे आहे प्रकरणसमाधान काशीराम खिरोडकर (३९) असे आरोपीचे नाव असून, तो जळगाव जामोद (बुलडाणा) तालुक्यातील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची होती. ती इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील खारीज करून आरोपीला दणका दिला. आरोपीचे कृत्य निंदनीय असल्याचे मत निर्णयात नमूद करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय