शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पावसाअभावी माेसंबीची २०० झाडांची बाग वाळल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : पावसाअभावी माेसंबीची २०० झाडांची बाग वाळल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रानवाडी येथे साेमवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

महेश हेमराज बेहनिया (२७, रा. रानवाडी, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या निधनानंतर महेश कुटुंबाची जबाबदारी सांभाळायचा व शेती करून उदरनिर्वाह करायचा. सततच्या नापिकीमुळे ताे हवालदील झाला हाेता. त्याने शेतात २०० झाडांची माेसंबीची बाग तयार केली हाेती. त्यात पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आणि माेसंबीची छाेटी झाडे सुकायला सुरुवात झाली.

या प्रकारामुळे महेश हताश झाला. त्यातच त्याने साेमवारी सकाळी शेतात कुणीही नसताना विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. त्याच्या श्चात आई, बहीण व दाेन भाऊ आहेत. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास बीट जमादार प्रज्योग तायडे करीत आहेत.

..

महिनाभरातील तिसरी घटना

जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. यापूर्वी चांदणीबर्डी व घाेगरा येथील तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तरुण शेतकऱ्यांना शेती करताना नैराश्य येत असल्याने तसेच त्यातून ते आत्महत्या करण्याचे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मात्र, सरकार व प्रशासन या आत्महत्या थांबविण्यासाठी काहीही उपाययाेजना करायला तयार नाहीत.