शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
3
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
5
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
6
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
7
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
8
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
9
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
10
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
11
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
12
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
13
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
14
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
15
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
16
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
17
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
18
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
19
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
20
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

५० टक्के सिंचन झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत

By admin | Updated: May 29, 2017 03:07 IST

विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ५० टक्के सिंचन क्षमतेचा विकास होत नाही,

नितीन गडकरी : विदर्भात दूध उत्पादन वाढविणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात शेतजमिनीच्या सिंचनाची टक्केवारी वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ५० टक्के सिंचन क्षमतेचा विकास होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र शासनाला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने जलसंवर्धनासाठी मोठे पाऊल उचलले आहे व यामुळे भूजल पातळीदेखील वाढत आहे. मात्र सिंचन क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता विदर्भात विविध योजना आणण्यात येत आहे. विदर्भात दूध उत्पादन वाढावे व यातून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी विशेष प्रकल्प सुरू होणार आहे. याची जबाबदारी ‘एनडीडीबी’ला (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) देण्यात आली असून, २५ लाख लिटर दूध उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेत विदर्भातील सात तर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील तीन ते पाच लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले. नागपूर मनपाने ‘एनडीडीबी’ला शहरातील ४० ठिकाणांवर दूध विकण्याची परवानगी दिली आहे. ४ जून रोजी नागपुरात या योजनेचा शुभारंभ होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.गडचिरोलीत अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू झाले असून, यामुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच गडचिरोली व वर्धा येथून मध गोळा करून त्याची आयात करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायाला वाढविण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी गडकरी यांनी गेल्या तीन वर्षांत मिहान व नागपुरात आलेल्या गुंतवणुकीविषयी तसेच विकास कामांविषयी माहिती दिली. आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. मल्लिकार्जुन रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.