शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आईची दोन मुलांसह आत्महत्या

By admin | Updated: May 18, 2015 02:29 IST

कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला.

विहिरीत घेतली उडी : हिवराबाजार येथील घटनादेवलापार : कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रीती कवडू वासनिक (२५, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृत आईचे तर शंतनू (७) आणि सिद्धांत (४) अशी मृत मुलांची नावे आहेत. कवडू वासनिक (४५) याला पहिल्या पत्नीपासून अपत्य नसल्याने त्याने तिच्या संमतीने २०१० मध्ये प्रीतीशी विवाह केला. प्रीतीचाही हा दुसरा विवाह होता. तिला पहिल्या घरचा शंतनू हा मुलगा असून, शाळेत त्याचे नाव शंतनू कवडू वासनिक असे आहे. त्यानंतर सिद्धांतचा जन्म झाला. दरम्यान, या दोघींमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. कवडूच्या पहिल्या पत्नीला रविवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे जावयाचे होते. त्यामुळे कवडूने तिच्यासाठी चहा तयार केला होता. ती घरून निघून गेल्यानंतर कवडू व प्रीतीमध्ये याच कारणावरून भांडण झाले. कवडूने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कवडूने त्याच्या पहिल्या पत्नीशी बोलू नये, असा हट्ट धरला होता. तो किराणा दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला. तो मध्यंतरी घरी परल्यानंतर शंतनू व सिद्धांत दोघेही घराबाहेर खेळत होते. प्रीती डॉक्टरकडे गेल्याचे मुलांनी त्याला सांगितले. त्यानंतर तो दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुन्हा घरी आला. त्यावेळी मुले घरी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चौकशी केली असता, कुणाला काहीही माहिती नव्हते. दरम्यान, हिवराबाजार - फुलझरी रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांत बागडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोन्ही मुलांच्या चपला आढळून आल्या. संशय आल्याने बागडे यांनी विहिरीत डोकवले असता, सिद्धांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. काही वेळातच प्रीतीने दोन माुलांसह विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)