शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शुगर सोबतच वजनही कमी करणारी औषधे : सुनील गुप्ता यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 23:09 IST

पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमधुमेहाच्या रुग्णांसाठी नवे उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मधुमेहाच्या रुग्णांसाठी नवे संशोधन व उपचार प्रणाली वरदान ठरणारी आहे. विशेष म्हणजे, ‘ग्लिफ्लोझीन’या औषधांच्या ग्रुपमुळे शरीरात वाढलेली साखर लघवीतून बाहेर टाकणे आता शक्य झाले आहे. तसेच पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.‘सुनील डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ व ‘डायबिटीज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिल्व्हर ज्युबली’ वर्षाच्या निमित्ताने १८ ऑगस्ट रोजी सायंटिफिक सभागृहात सकाळी ८.३० वाजतापासून ‘हॅलो डायबिटीज’ शैक्षणिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजय अंबाडे, डॉ. मोहित झामड, डॉ. कविता गुप्ता व डॉ. सरिता उगेमुगे उपस्थित होत्या.डॉ. गुप्ता म्हणाले, भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तरुणांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे येत्या दहा वर्षात पुढे येणारे चित्र धक्कादायक असू शकेल. यातून मार्ग काढण्यासाठी या आजाराची जनजागृती आवश्यक आहे. गेल्या २५ वर्षांतून ‘हॅलो टायबिटीज’मधून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व रुग्णांना या विषयी माहिती देऊन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.औषधे गाठणार शंभरीडॉ. गुप्ता म्हणाले, मधुमेहावरील औषधांना येत्या २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहे. या रोगावरील औषधांमध्ये नित्य बदल होत गेले आहे. परंतु नुकतेच आलेल्या ‘इम्पा ग्लिफ्लोझीन’, ‘डापा ग्लिफ्लोझीन’, ‘कामा ग्लिफ्लोझीन’ औषधे रुग्णांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या उपलब्ध गोळ्या शरीरातील इन्सुलिनवर नियंत्रण मिळवितात. परंतु या औषधांमुळे शरीरात वाढलेली साखर थेट लघवीवाटे बाहेर पडते. यामुळे मूत्रपिंड, हृदय, ‘हार्ट फेल्युअर’चा धोका कमी होतो.हृदय, मूत्रपिंडाला मिळते संरक्षण‘गल्प-१ अ‍ॅनालॉम’ या लसीमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, सोबतच वजन कमी होण्यास मदतही करते. या लसीमुळे हृदय, मूत्रपिंडाला संरक्षण मिळते. ‘हार्ट फेल्युअर’ धोका कमी होतो व रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासही मदत करते, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.

टॅग्स :diabetesमधुमेहdoctorडॉक्टर