शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टर-गायकांसोबत रंगले ‘शुगर संगीत’ !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:49 IST

लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) डॉ. जतिंदर अरोरा व डायरेक्टर (आॅपरेशन्स) सूरज त्रिपाठी यांनी दीप प्रज्वलन केले. डॉ. नितीन वडसकर, डॉ. नितीन डंभारे, डॉ. ऋषी लोहिया, डॉ. निशांत देशपांडे, डॉ. अभिषेक वांकर, डॉ. अभिजित देशमुख आणि डॉ. प्रकाश जैन यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले तर सागर मधुमटके, सारंग जोशी, विजय चिवंडे, श्रुती चौधरी व सोनाली यांनी आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांची मने जिंकली. संचालन नेहा जोशी यांनी केले. पहिल्या सत्रात डॉ. नितीन वडसकर म्हणाले, अनियमित दिनचर्या, बदलती जीवनशैली व तणावामुळे देशात डायबिटीजचे रुग्ण वाढत आहेत. अशक्तपणा, भूक लागणे, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांनी कमी दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अनुवांशिकता आणि जास्त वजनामुळेही हा आजार होऊ शकतो. डॉ. ऋषी लोहिया म्हणाले, शुगरच्या रुग्णांना हृदयरोगाची शक्यता असते. त्यांना ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते. छातीत दुखण्याचे कारणही शुगर असू शकते. त्यामुळे रक्तदाबाची तपासणी आणि वर्षातून किमान एकदा ईसीजी करणे आवश्यक आहे. दुसºया सत्रात डॉ. नितीन डंभारे यांनी सांगितले की, या आजारामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा बंद होऊन जाते. त्यामुळे वेळोवेळी इन्सुलिन देणे गरजेचे आहे. औषध बंद करून घरगुती उपचार करणे घातक ठरू शकते. डॉ. अभिषेक वांकर म्हणाले, शुगरमुळे रक्ताभिसरण बाधित होते. धमण्यांवरील दबावामुळे शरीरात आग, मुंग्या येण्याची शक्यता असते. तिसºया सत्रात डॉ. अभिजित देशमुख यांनी डायबिटीजमुळे पोटाचे विकार वाढत असल्याचे सांगितले. हे विकार अनियंत्रित झाल्यास फुफ्फुस आणि पैन्क्रियाजलाही नुकसानकारक ठरू शकतात. डॉ. निशांत देशपांडे म्हणाले, डायबिटीज किडनीच्या फिल्टरला खराब करू शकते. त्यामुळे प्रोटीन, मिठाची मात्रा संतुलित असली पाहिजे. डॉ. प्रकाश जैन म्हणाले, गँगरिन किंवा इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. सध्या असे तंत्र उपलब्ध आहे की ज्याद्वारे अवयव कापण्याची गरज पडत नाही.

टॅग्स :doctorडॉक्टरcultureसांस्कृतिक