शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तासभर दमदार

By admin | Updated: June 27, 2017 01:54 IST

गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला.

३८.८ मि.मी. पाऊ स : उपराजधानीत सर्वत्र पाणी-पाणी, वाहतूकही विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. उड्डाणपूल,चौक व वस्त्यांत पावसाच्या तडाख्यात सापडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पावसाळी नाल्या साफ नसल्याने पाऊ स थांबल्यानंतर बराच वेळ पाणी साचून असल्याचे चित्र होते. नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ३८.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे व सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मध्य भारतात मान्सूनला सुरुवात झाली आहे. नागपूर शहरात सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ नंतर आकाशात ढग जमायला लागले. दीड वाजताच्या सुमारास गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात जोराचा पाऊ स झाला. जवळपास सव्वातास चांगला पाऊ स झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.उड्डाणपुलावरपाणी साचलेउड्डाणपुलावर सहसा पाणी साचत नाही. परंतु टेकडी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी पाणी साचले होते. किंग्सवे, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स व एलआयसी चौकातही पाणी साचले होते. रेल्वेस्टेशनवर जायचे कसे?पावसामुळे रेल्वेस्टेशन परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे स्टेशनमधून बाहेर पडणारे व स्टेशनवर जाणारे प्रवासी त्रस्त झाले होते. स्टेशनवर जायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. रामझुला व टेकडी मंदिराच्या समोरील खोलगट भागात पाणी साचले होते. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पाऊ स आला की पाणी साचतेपाऊ स आला की शहरातील काही ठिकाणी पाणी साचते. यात नरेंद्रनगर पूल, लोहापूल, शंकरनगर चौक, जगनाडे चौक, रेशीमबाग मैदानाजवळचा भाग, मेडिकल चौक, वर्धा रोडचा काही भाग, पारडी चौक ते कळमन्याकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणांचा यात समावेश आहे. कळमना बाजारातीलमिरचीचे नुकसानपावसामुळे कळमना बाजारात उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य व मिरचीची पोती भिजल्याची माहिती आहे. शेतमाल ठेवण्यासाठी शेड उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. मनपाची पोलखोल४शहरात मुसळधार पाऊ स झाला नाही. तास-दीड तास पाऊ स पडला, पण थोड्याशा पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचते. अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे, ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, बुजलेल्या पावसाळी नाल्या, सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे थोडासा पाऊ स झाला तरी पाणी साचते. यामुळे महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोल खुलली आहे. नाल्यातील गाळ व कचरा साफ न केल्याने पाणी तुंबत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.