शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यातील वृक्षलागवड मोहीम यशस्वी; 33 कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:47 IST

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या यावर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर रोजी ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देहे लोकसहभागाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  

हरित महाराष्ट्रही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. २०१६ मध्ये १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले होते. वृक्षरोपणाच्या या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यात २ कोटी ८३ हजार इतकी वृक्षलागवड करण्यात आली. २०१७ मध्ये १ ते ३० जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प होता. यावर्षीसुद्धा ५ कोटींहून अधिक झाडे राज्यात लावण्यात आली. २०१८ मध्ये १ ते ३० जुलैदरम्यान १३ कोटींच्या वृक्षलागवडीचा निर्धार करण्यात आला होता. या योजनेलाही जनतेने उदंड प्रतिसाद दिला. यावर्षी १५ कोटी ८८ लक्ष झाडे लावण्यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केले होते.बुधवारी राज्यात ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ इतकी झाडे लावल्याची नोंद दुपारी करण्यात आल्याने या वर्षीचाही निर्धार पूर्णत्वास केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३ वर्षात ५० कोटी वृक्षांच्या लागवडीचे व्रत पूर्णत्वास नेले आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी राज्यातील नागरिकांना दिले असून, हे लोकसहभागाचेच यश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांप्रती आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार