शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

By admin | Updated: February 28, 2016 03:13 IST

स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे.

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर : ‘लोकमत’शी साधला संवादनागपूर : स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे. येणाऱ्या दिवसात असे आणखी वैज्ञानिक आविष्कार पाहायला मिळतील. याचा फायदा सामान्य जनतेला होईल. देशातील वैज्ञानिक लोकांना चंद्रावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे व्यक्त केले. लोकमतशी चर्चा करतांना डॉ. नारळीकर यांनी देश आणि विदेशात सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक प्रयोग व शोध सातत्याने सुरू राहतात. पहाडाचे शिखर आणि दरी यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकतांना डॉ. नारळीकर यांनी सांगितले, एक वेळ असते जेव्हा अनेक प्रकारचे शोध समोर येतात. तो क्षण पहाडाच्या शिखरासारखा असतो. त्यानंतर नवीन संशोधनाच्या कामाला लागणे म्हणजे खालून पहाडावर चढण्यासारखे असते. जेव्हा शिखरावर पोहोचू तेव्हा संशोधन पूर्ण होते. असेच शोध सातत्याने होत असतात. (प्रतिनिधी)एका ‘गॉड पार्टीकलने’ काही होणार नाहीडॉ. नारळीकर यांनी सांगितले की, गॉड पार्टीकलच्या शोधात जगभरातील वैज्ञानिक गुंतले आहेत. त्यात एकाच गॉड पार्टीकलचा शोध लागला आहे. केवळ एका पार्टीकलच्या शोधाने कुठलाही फायदा किंवा नुकसान समजून येणार नाही. आणखी पार्टीकलचा शोध करण्यात यावा. पार्टीकल फिजिक्समध्ये आणखी सक्रिय व्हावे लागेल. गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यास उशीर झालेला नाही गुरुत्वाकर्षण लहरींबाबत आईन्स्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वीच घोषणा केली असली तरी त्याला ट्रेस करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ते शोधण्यास उशीर झालेला नाही. मागील १० वर्षांपासून ‘लायगो एक्सपरिमेंट’ केले जात होते. परंतु अ‍ॅडव्हॉन्स लायगो एक्सपरिमेंट करण्यात आल्यामुळेच या लहरी ट्रेस करता येऊ शकतात. त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर संशोधन सुरू आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी सांगितले.