शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

By admin | Updated: February 28, 2016 03:13 IST

स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे.

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर : ‘लोकमत’शी साधला संवादनागपूर : स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे. येणाऱ्या दिवसात असे आणखी वैज्ञानिक आविष्कार पाहायला मिळतील. याचा फायदा सामान्य जनतेला होईल. देशातील वैज्ञानिक लोकांना चंद्रावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे व्यक्त केले. लोकमतशी चर्चा करतांना डॉ. नारळीकर यांनी देश आणि विदेशात सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक प्रयोग व शोध सातत्याने सुरू राहतात. पहाडाचे शिखर आणि दरी यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकतांना डॉ. नारळीकर यांनी सांगितले, एक वेळ असते जेव्हा अनेक प्रकारचे शोध समोर येतात. तो क्षण पहाडाच्या शिखरासारखा असतो. त्यानंतर नवीन संशोधनाच्या कामाला लागणे म्हणजे खालून पहाडावर चढण्यासारखे असते. जेव्हा शिखरावर पोहोचू तेव्हा संशोधन पूर्ण होते. असेच शोध सातत्याने होत असतात. (प्रतिनिधी)एका ‘गॉड पार्टीकलने’ काही होणार नाहीडॉ. नारळीकर यांनी सांगितले की, गॉड पार्टीकलच्या शोधात जगभरातील वैज्ञानिक गुंतले आहेत. त्यात एकाच गॉड पार्टीकलचा शोध लागला आहे. केवळ एका पार्टीकलच्या शोधाने कुठलाही फायदा किंवा नुकसान समजून येणार नाही. आणखी पार्टीकलचा शोध करण्यात यावा. पार्टीकल फिजिक्समध्ये आणखी सक्रिय व्हावे लागेल. गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यास उशीर झालेला नाही गुरुत्वाकर्षण लहरींबाबत आईन्स्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वीच घोषणा केली असली तरी त्याला ट्रेस करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ते शोधण्यास उशीर झालेला नाही. मागील १० वर्षांपासून ‘लायगो एक्सपरिमेंट’ केले जात होते. परंतु अ‍ॅडव्हॉन्स लायगो एक्सपरिमेंट करण्यात आल्यामुळेच या लहरी ट्रेस करता येऊ शकतात. त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर संशोधन सुरू आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी सांगितले.