शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

उपराजधानीत सोने विक्री वाढली

By admin | Updated: October 27, 2014 00:31 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये

नागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. यंदा सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण होते. सुरक्षित आणि घसघशीत रिटर्न्स मिळत असल्याने सोने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे सराफांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपुजनापर्यंत नेमकी किती उलाढाल झाली याबाबत सराफ अधिकृतपणे माहिती देत नसले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खरेदीला प्रचंड उत्साह दिसून आला. यंदा सोन्याच्या नाण्यांना विशेष मागणी होती. सोनेखरेदी हा गुंतवणुकीचाही सुरक्षित पर्याय असल्याने ग्राहक या मौल्यवान दागिन्याची खरेदी करत असल्याचे सराफांनी सांगितले.तयार फराळाकडे कलयंदाच्या दिवाळीत तयार फराळ घेण्याकडे गृहिणींचा कल दिसून आला. याशिवाय अनेक महिला मंडळांनी फराळ तयार करून विक्रीवर भर दिला. तयार फराळ विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. दिवाळीसाठी लागणारी करंजी ३०० रुपये किलो, शंकरपाळे २४० रुपये, चकल्या २६० रुपये, लाडू १५० रुपये, शेव २०० आणि चिवडा २२५ रुपये किलो दराने विकला गेला. ड्रायफ्रूटला सर्वाधिक पसंतीगेल्या काही वर्षांपासून मिठाईच्या तुलनेत भेटस्वरुपात देण्यासाठी ड्रायफ्रूटला मागणी वाढत आहे.विविध दुकानांमध्ये १०० ग्रॅमपासून १ किलोपर्यंत ड्रायफ्रूटचे आकर्षक बॉक्स होते. यंदा काश्मीरमधील पूरस्थिती आणि हवामान बदलामुळे उत्पादन घटले. त्यामुळे आक्रोड मगजचे भाव दुपटीपेक्षा जास्त वाढले. सरासरी १८०० ते २२५० रुपये किलोपर्यंत आक्रोडची विक्री झाली. याशिवाय किसमिस, काजू, बादाम आदींचेही भाव वाढले होते.फूड इंडस्ट्रीत तेजीसणासुदीच्या दिवसांचा सर्वात जास्त फायदा होतोय तो फास्ट फूड इंडस्ट्रीला. दिवाळीच्या दिवसात सगळीकडेच ताव मारला जातोय तो खाण्यापिण्याच्या पदार्थांवर. म्हणूनच दिवाळीनिमित्त फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी चविष्ठ पॅकबंद पक्वाने बाजारात आणली. ग्राहकांकडूनही तितकाच प्रतिसाद मिळाला. काही कंपन्यांनी पक्वान्नांचे पॅक आणून गृहिणींना दिलासा दिला. नागपुरात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॅकबंद मिठाईची कोट्यवधींची उलाढाल झाल्या.(प्रतिनिधी)