शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

उपराजधानीत सोने विक्री वाढली

By admin | Updated: October 27, 2014 00:31 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये

नागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. यंदा सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण होते. सुरक्षित आणि घसघशीत रिटर्न्स मिळत असल्याने सोने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे सराफांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपुजनापर्यंत नेमकी किती उलाढाल झाली याबाबत सराफ अधिकृतपणे माहिती देत नसले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खरेदीला प्रचंड उत्साह दिसून आला. यंदा सोन्याच्या नाण्यांना विशेष मागणी होती. सोनेखरेदी हा गुंतवणुकीचाही सुरक्षित पर्याय असल्याने ग्राहक या मौल्यवान दागिन्याची खरेदी करत असल्याचे सराफांनी सांगितले.तयार फराळाकडे कलयंदाच्या दिवाळीत तयार फराळ घेण्याकडे गृहिणींचा कल दिसून आला. याशिवाय अनेक महिला मंडळांनी फराळ तयार करून विक्रीवर भर दिला. तयार फराळ विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. दिवाळीसाठी लागणारी करंजी ३०० रुपये किलो, शंकरपाळे २४० रुपये, चकल्या २६० रुपये, लाडू १५० रुपये, शेव २०० आणि चिवडा २२५ रुपये किलो दराने विकला गेला. ड्रायफ्रूटला सर्वाधिक पसंतीगेल्या काही वर्षांपासून मिठाईच्या तुलनेत भेटस्वरुपात देण्यासाठी ड्रायफ्रूटला मागणी वाढत आहे.विविध दुकानांमध्ये १०० ग्रॅमपासून १ किलोपर्यंत ड्रायफ्रूटचे आकर्षक बॉक्स होते. यंदा काश्मीरमधील पूरस्थिती आणि हवामान बदलामुळे उत्पादन घटले. त्यामुळे आक्रोड मगजचे भाव दुपटीपेक्षा जास्त वाढले. सरासरी १८०० ते २२५० रुपये किलोपर्यंत आक्रोडची विक्री झाली. याशिवाय किसमिस, काजू, बादाम आदींचेही भाव वाढले होते.फूड इंडस्ट्रीत तेजीसणासुदीच्या दिवसांचा सर्वात जास्त फायदा होतोय तो फास्ट फूड इंडस्ट्रीला. दिवाळीच्या दिवसात सगळीकडेच ताव मारला जातोय तो खाण्यापिण्याच्या पदार्थांवर. म्हणूनच दिवाळीनिमित्त फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी चविष्ठ पॅकबंद पक्वाने बाजारात आणली. ग्राहकांकडूनही तितकाच प्रतिसाद मिळाला. काही कंपन्यांनी पक्वान्नांचे पॅक आणून गृहिणींना दिलासा दिला. नागपुरात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॅकबंद मिठाईची कोट्यवधींची उलाढाल झाल्या.(प्रतिनिधी)