शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय विद्यार्थ्यांना पास मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या एसटी महामंडळाच्या धोरणांमुळे एसटीच्या पासेस विद्यार्थ्यांना अजून ...

नागपूर : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या एसटी महामंडळाच्या धोरणांमुळे एसटीच्या पासेस विद्यार्थ्यांना अजून मिळालेल्या नाही. शाळांचे मुख्याध्यापक पत्र घेऊन डेपोत गेल्यानंतर डेपो प्रमुखांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय पासच मिळणार नाही, असे स्पष्ट सांगत आहे. विद्यार्थ्यांकडे प्रवासी व्यवस्था नसल्याने आठवडा लोटल्यानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे.

जिल्ह्यात १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ च्या शाळा सुरू झाल्या. त्यासाठी शाळांना ग्रामपंचायतीकडून परवानगी घ्यावी लागली. ८ ते १२ च्या जिल्ह्यातील ७५४ शाळांपैकी पहिल्या दिवशी ९२ शाळा सुरू झाल्या १८३० विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित झाले. १९ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या ३ हजारावर पोहचली. ही संख्या अतिशय कमी आहे. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था तोकडी आहे. शाळा सुरू झाल्यापासून राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात बसेसची व्यवस्था करणे गरजेचे होते. अजूनही अनेक मार्गावरील बसेस सुरू झाल्या नाही. शाळांच्या मुख्याध्यापकांनी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात पत्रसुद्धा डेपोकडे पाठविले.

ज्या मार्गावर बसेस सुरू झाल्या, विद्यार्थी शाळेत यायला लागले, त्या विद्यार्थ्यांना पासची गरज भासू लागली आहे. पूर्वी मुख्याध्यापकाच्या पत्रावर विद्यार्थ्यांना पास दिल्या जायच्या. यंदा मात्र डेपो प्रमुखाकडून सांगण्यात आले की शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याशिवाय पासेस देऊ शकत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या या धोरणासंदर्भात शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. महामंडळाकडून पासेससाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र हवे, असे कुठलेही पत्र शिक्षण विभागाला मिळाले नाही. पासेस उपलब्ध नसल्यामुळे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होत आहे.

- दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात ८ ते १२ वर्गाच्या एकूण शाळा - ७५४

जिल्ह्यात ८ ते १२ चे एकूण विद्यार्थी - १२२३४०

सोमवारपर्यंत सुरू झालेल्या शाळा - १४१

शाळेत उपस्थित झालेले विद्यार्थी - ३१७९

शाळेत उपस्थित शिक्षकांची संख्या - ७८१

- तालुक्याच्या ठिकाणी शाळा असल्यामुळे खेड्यापाड्यातून २० ते ३० किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थी शाळेत येतात. बसेसच्या फेऱ्या नसल्याने किंवा पास उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी जात आहे. मुळात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतांनाच महामंडळाने प्रवासी व्यवस्था सुरू करणे गरजेचे होते.

सुनील राऊत, शिक्षक