शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

नागपूर जिल्ह्यातील नवेगावात विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:39 IST

केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या नवेगाव (खैरी) (ता. पारशिवनी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.

ठळक मुद्देभिंतीची उंची फारच कमी शिक्षकाच्या निवासस्थानात चार तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या नवेगाव (खैरी) (ता. पारशिवनी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्याने विद्यालयाच्या प्राचार्याकडील पाळीव कुत्र्याची शिकार केली. त्यामुळे येथील विद्यार्थी प्रचंड दहशतीत असून, पालक चिंतेत आहेत. पालकांनी या बिबट्याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. परंतु, वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच आहे.नागपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथे असून, हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. दीड वर्षांपासून या विद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर आहे. पूर्वी या बिबट्याचे अधूनमधून दर्शन व्हायचे. हल्ली त्याचा वावर वाढला आहे. मागील आठवड्यात त्याने एका शिक्षकाच्या निवासस्थानात चक्क १० दिवस मुक्काम ठोकला होता. त्यानंतर अन्य एका शिक्षकाच्या निवासस्थानात चार तास ठिय्या मांडला होता, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली असून, त्याला शाळेचे प्राचार्य राम देव व शिक्षकांनी दुजोरा दिला. याबाबत प्राचार्य देव यांनी वन अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळी माहिती दिली. परंतु, वन विभागाने त्या बिबट्याचा अद्यापही कायम बंदोबस्त केला नाही.यासंदर्भात पालकांनी प्राचार्य राम देव यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. ही शाळा निवासी असल्याने पालकांनी त्यांची चिंताही यावेळी व्यक्त केली. या विद्यालयाच्या एका भागाला पहाडी व जंगल असून, शाळा व वसतिगृहाच्या आवाराची सुरक्षा भिंत ही या इमारतीपासून बरीच दूर आहे. शिवाय, या भिंतीची उंची फारच कमी आहे. काही ठिकाणी ही भिंत बेपत्ता झाली आहे. त्यामुळे बिबट्यासह इतर वन्य प्राणी या शाळेच्या परिसरात सहज प्रवेश करू शकतात. बिबट्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता बळावल्याने पालकांची हुरहुर वाढली आहे. वन विभागाची या गंभीर प्रकाराबाबतची अनास्था ही अनाकलनीय आहे.विद्यार्थ्यांपेक्षा बिबट महत्त्वाचा?या बिबट्याला आता मानवी सहवासाची सवय जडू लागली आहे. हा बिबट काही दिवसांपूर्वी प्राचार्य देव याच्या मुलीवर गुरगुरला होता. त्यामुळे त्याचा धीटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्याचा कायम बंदोबस्त करणे वन विभागाला फारसे अवघड नाही. कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला बेशुद्ध करून पकडावे आणि दूरवरच्या दुसऱ्या जंगलात सोडून देणे सहज शक्य आहे. मात्र वन अधिकारी येथील ४८० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जीविताची चिंता न करता त्या बिबट्याला महत्त्व देत असल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.भोजनकक्ष अर्धा कि.मी. अंतरावरया शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत एकूण ४८० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व जण शाळेच्याच परिसरात राहत असल्याने शाळा, वसतिगृह, भोजनकक्ष, प्रार्थनाकक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा विविध इमारती आहेत. इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या वसतिगृह ते भोजनकक्ष हे अंतर अर्धा किमी एवढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज भोजनकक्षात पायी जावे व परत यावे लागते. रात्रीच्यावेळी बिबट या मुलांवर हल्ला चढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थिनी व इतर विद्यार्थ्यांचे भोजनकक्ष त्यांच्या वसतिगृहापासून जवळ आहे.उंच सुरक्षा भिंत गरजेचीया शाळेचा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असला तरी तो जंगलव्याप्त आहे. त्यामुळे शाळेच्या संपूर्ण आवाराला उंच व मजबूत सुरक्षा भिंत असणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याशी चर्चा केली. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच ही मागणी मंजूर होईल. उंच भिंतीमुळे वन्य प्राण्यांच्या शाळा परिसरातील शिरकावाला प्रतिबंध घालणे शक्य होईल.- राम देव, प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय,नवेगाव (खैरी).

टॅग्स :leopardबिबट्या