शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

विद्यार्थ्यांना आता टीव्हीद्वारे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोनाची परिस्थिती पाहता शिक्षण पुढे नेण्यासाठी देशभरात जे चांगले प्रयोग झाले त्यावर विचार केला पाहिजे. पुढे कोरोनाचे ...

नागपूर : कोरोनाची परिस्थिती पाहता शिक्षण पुढे नेण्यासाठी देशभरात जे चांगले प्रयोग झाले त्यावर विचार केला पाहिजे. पुढे कोरोनाचे संकट असेच कायम राहिले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टीव्हीद्वारे शिक्षण देण्याचा नवा पर्याय विचाराधीन आहे. शिक्षण विभागामार्फत यासंबंधीचे व्हिडीओ तयार करून उपलब्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून दुपारच्या वेळेत हे शिक्षण दिले जाऊ शकते. या संबंधीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे सादर केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

नागपुरात बोलताना शिक्षण राज्यमंत्री कडू म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी आहे. ही संधी साधून प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यास हरकत नाही. आधीच दीड वर्षे तशीच गेली आहेत. आता पालक व विद्यार्थ्यांनीही या मानसिकतेतून बाहेर येणे आवश्यक आहे. आठ महिने नाही तर किमान चार महिन्यांची शाळा करून मुलांना आवश्यक शिक्षण कसे देता येईल, यावर लक्ष देणे गरजेेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गासाठी आवश्यक असलेले पूरक शिक्षण मिळेल, एवढाच अभ्यासक्रम शिकविला जाईल, असे नियोजन केले जाईल.

शाळा सुरू करण्यावर काही मंत्र्यांचा आक्षेप

- शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्स व काही मंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. शेवटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. तसेही जिल्हाधिकारी, सरपंच व स्थानिक पदाधिकारी यांनी निर्णय घ्यायचा आहे. आता मुख्यमंत्री पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय घेतील, असेही कडू यांनी स्पष्ट केले.