शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले ते विद्यार्थीही अकरावी प्रवेशास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:12 IST

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण नाहीत म्हणून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी दिला.

यासंदर्भात जतीन घाेटेकर या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. जतीनने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई अंतर्गत पूर्ण केले आहे. त्याला इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३३ टक्के गुण आहेत. सीबीएसईच्या निकषानुसार तो या विषयात उत्तीर्ण झाला आहे. दहावीनंतर त्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. संबंधित महाविद्यालयाने त्याला प्रवेशही दिला. पुढे त्याने इयत्ता अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करून इयत्ता बारावीची परीक्षा दिली. दरम्यान, राज्य मंडळाला जतीनने इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३५ टक्के गुण मिळविले नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचा अकरावीतील प्रवेश अवैध ठरवण्यात आला. पात्र नसताना जतीनला अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला असे कारण मंडळाने दिले. त्यामुळे जतीनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता जतीनला इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी पात्र ठरवले, तसेच राज्य मंडळाचा विवादित निर्णय रद्द केला. याशिवाय, जतीनचा इयत्ता बारावीचा निकाल सात दिवसात जाहीर करा, असा आदेश मंडळाला दिला. जतीनच्यावतीने ॲड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.