शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

स्वातंत्र्य दिनालाही विद्यार्थ्यांना गणवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आहे़ स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गणवेश विद्यार्थ्यांना ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आहे़ स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची कुठलीही चिन्हे नाहीत. केंद्र सरकारने गणवेशाचा निधीच राज्याला पाठविला नसल्याने राज्याने तो जिल्हा परिषदांच्या तिजोरीत वर्ग केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ६४ हजार विद्यार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे़

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुले तसेच सर्व मुलींना मोफत गणवेशाची योजना आहे़ दोन गणवेश देण्यात येतात. त्यासाठी ६०० रुपयांची प्रतिविद्यार्थी अनुदानाची तरतूद आहे़ यामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के निधी व राज्य सरकारचा ४० टक्के निधी अनुदान स्वरूपात देण्यात येतो. मात्र राज्याच्या समग्र शिक्षण संचालनालयाने ६० टक्के निधी केंद्राकडूनच अप्राप्त असल्याने राज्याने उर्वरित निधी पाठविला नसल्याचे कारण सांगितले़ दरवर्षी स्वातंत्र्य दिनापर्यंत गणवेश विद्यार्थ्यांना मिळतात़ सध्या शाळा कोरोना संकटाच्या प्रतिबंधित नियमांचे कारण देत ऑनलाईन आहेत. विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर जाऊन आपली हजेरी लावावी लागणार आहे. जवळपास जिल्ह्याला २ कोटी ८९ लाखांचा निधी मिळाला नाही. याबाबत नागपूर जिल्हा परिषदेने गणवेशाचा निधी मागणी प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडे जून महिन्यातच पाठविला होता. संचालनालयाचे काहीच उत्तर प्राप्त झाले नाही. राज्याने निधी संचालनालयाला न दिल्याने तो जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वळता न झाल्याची माहिती आहे़ कोरोना संकटामुळे हा निधी प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येते़ त्यामुळे गणवेशाच्या निधीला दिवाळीचा मुहूर्त निघेल काय, असाही सवाल पालक विचारत आहेत.

ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थीही वंचित

ओबीसी व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात नाही. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून ५५ लाखाची तरतूद करण्यात आली़ या निधीच्या तरतुदीवरून मोठे रान उठले हाते़ राज्य सरकारने जिल्हा परिषदेला मिळणारे महसुलापोटीचे अनुदान न दिल्याने तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शेष फंडाच्या योजनांना फटका बसला़ ही योजनाही बारगळते की काय, असे चित्र आहे़