शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

विद्यार्थ्यांनो, उद्योजक बना !

By admin | Updated: July 1, 2015 03:14 IST

तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे.

उदय देसाई : रायसोनी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नागपूर : तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे. त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करून शिक्षण झाल्यानंतर नोकरी मागण्यापेक्षा अनेकांना नोकरी देणारे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत ‘आयआयटी हैदराबाद’चे संचालक डॉ. उदय देसाई यांनी व्यक्त केले. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला ‘व्हीएनआयटी’चे माजी संचालक डॉ. एस. एस. गोखले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, ‘व्हीजेटीआय’चे संचालक डॉ. ओ.जी. काकडे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज हे प्रामुख्याने उपस्थित होते. आजचा काळ हा स्पर्धेचा आहे व विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे व आपल्या सभोवताली असलेल्या विविध समस्यांचे उत्तर केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच उत्तर मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची बरीच संधी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थी इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतात. जागतिकीकरणाच्या या युगात नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत डॉ. काणे यांनी व्यक्त केले. डॉ. बजाज यांनी अहवाल वाचन केले तर डॉ. संजय वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)