शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

विद्यार्थ्यांनो, उद्योजक बना !

By admin | Updated: July 1, 2015 03:14 IST

तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे.

उदय देसाई : रायसोनी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नागपूर : तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कर्तृत्व व यशस्वी होण्याची जिद्द आहे. त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करून शिक्षण झाल्यानंतर नोकरी मागण्यापेक्षा अनेकांना नोकरी देणारे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत ‘आयआयटी हैदराबाद’चे संचालक डॉ. उदय देसाई यांनी व्यक्त केले. जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला ‘व्हीएनआयटी’चे माजी संचालक डॉ. एस. एस. गोखले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, ‘व्हीजेटीआय’चे संचालक डॉ. ओ.जी. काकडे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज हे प्रामुख्याने उपस्थित होते. आजचा काळ हा स्पर्धेचा आहे व विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे व आपल्या सभोवताली असलेल्या विविध समस्यांचे उत्तर केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच उत्तर मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची बरीच संधी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थी इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतात. जागतिकीकरणाच्या या युगात नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत डॉ. काणे यांनी व्यक्त केले. डॉ. बजाज यांनी अहवाल वाचन केले तर डॉ. संजय वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)