शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना

By admin | Updated: March 7, 2017 02:21 IST

केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी ...

८,८०७ शाळांचा सहभाग : ‘इको क्लब’ चे बळकटीकरण होणारनागपूर : केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने आता ‘विद्यार्थी हरित सेना’ ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्या पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता मानवापुढील मोठे आव्हान ठरले आहे. मात्र लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात. त्यामुळे त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाबाबत गोडी आणि जागरूकता निर्माण केल्यास त्याचा भविष्यात चांगला परिणाम अनुभवास येऊ शकतो. या हेतूने राज्यात मागील २००७ पासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या अनुदानातून राज्यातील २५० शाळांमध्ये ‘राष्ट्रीय हरित सेना’ही योजना राबविली जात आहे. यामध्ये केंद्रातर्फे प्रत्येक शाळेला २५०० रुपयांचे अनुदान दिल्या जात होते. परंतु एवढ्या कमी अनुदानात शाळांना ठोस कार्यक्रम राबविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील ८,८०७ शाळांमधील ‘इको क्लब’ बळकट करण्यासाठी ‘विद्यार्थी हरित सेना’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ८,८०७ शाळांना प्रत्येकी २५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून संबंधित शाळांना विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांची अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्ष लागवड करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणविषयक दिन व सणांचे औचित्य साधून पर्यावरणविषयक जनजागृती करणे, असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)