शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना

By admin | Updated: March 7, 2017 02:21 IST

केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी ...

८,८०७ शाळांचा सहभाग : ‘इको क्लब’ चे बळकटीकरण होणारनागपूर : केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने आता ‘विद्यार्थी हरित सेना’ ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्या पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता मानवापुढील मोठे आव्हान ठरले आहे. मात्र लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात. त्यामुळे त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाबाबत गोडी आणि जागरूकता निर्माण केल्यास त्याचा भविष्यात चांगला परिणाम अनुभवास येऊ शकतो. या हेतूने राज्यात मागील २००७ पासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या अनुदानातून राज्यातील २५० शाळांमध्ये ‘राष्ट्रीय हरित सेना’ही योजना राबविली जात आहे. यामध्ये केंद्रातर्फे प्रत्येक शाळेला २५०० रुपयांचे अनुदान दिल्या जात होते. परंतु एवढ्या कमी अनुदानात शाळांना ठोस कार्यक्रम राबविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील ८,८०७ शाळांमधील ‘इको क्लब’ बळकट करण्यासाठी ‘विद्यार्थी हरित सेना’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ८,८०७ शाळांना प्रत्येकी २५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून संबंधित शाळांना विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांची अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्ष लागवड करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणविषयक दिन व सणांचे औचित्य साधून पर्यावरणविषयक जनजागृती करणे, असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)