शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना

By admin | Updated: March 7, 2017 02:21 IST

केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी ...

८,८०७ शाळांचा सहभाग : ‘इको क्लब’ चे बळकटीकरण होणारनागपूर : केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने आता ‘विद्यार्थी हरित सेना’ ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्या पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता मानवापुढील मोठे आव्हान ठरले आहे. मात्र लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात. त्यामुळे त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाबाबत गोडी आणि जागरूकता निर्माण केल्यास त्याचा भविष्यात चांगला परिणाम अनुभवास येऊ शकतो. या हेतूने राज्यात मागील २००७ पासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या अनुदानातून राज्यातील २५० शाळांमध्ये ‘राष्ट्रीय हरित सेना’ही योजना राबविली जात आहे. यामध्ये केंद्रातर्फे प्रत्येक शाळेला २५०० रुपयांचे अनुदान दिल्या जात होते. परंतु एवढ्या कमी अनुदानात शाळांना ठोस कार्यक्रम राबविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील ८,८०७ शाळांमधील ‘इको क्लब’ बळकट करण्यासाठी ‘विद्यार्थी हरित सेना’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ८,८०७ शाळांना प्रत्येकी २५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून संबंधित शाळांना विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांची अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्ष लागवड करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणविषयक दिन व सणांचे औचित्य साधून पर्यावरणविषयक जनजागृती करणे, असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)