शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर रेल्वेस्थानकावर अडकले २८ भाविक : गर्दीमुळे चढू शकले नाही गाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:31 IST

रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने केली जाण्याची व्यवस्था

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले. त्यांना जाण्यासाठी कुठलीही रेल्वेगाडी नव्हती. अखेर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि या भाविकांना त्यांच्या गावाकडे रवाना केले.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील निवासी चंद्रदत्त त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूणू ८० प्रवासी दहा दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला निघाले होते. जगन्नाथपुरी, श्रीशैलम, तिरुपती आदी तीर्थक्षेत्रांच्या दर्शनानंतर दोन दिवसांनी ते रामेश्वरमला पोहोचले. येथून त्यांना अलाहबादला जायचे होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यांच्याजवळ आरक्षणाची रेल्वे तिकिटे होती. मात्र, गाडी मिळत नसल्याने त्यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मिळेल त्या गाडीने ते अलाहबादकरिता निघाले. दरम्यान, ही गाडी अलाहबादला नव्हे तर दिल्लीला जात असल्याचे समजताच ते सर्व भाविक रविवारी नागपुरात उतरले. सकाळी आलेल्या एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. परंतु ८० पैकी ५२ प्रवाशांनाच गाडीत जागा मिळाली. उर्वरित २८ प्रवाशांना नागपुरातच थांबावे लागले. यावेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांची ताटातूट झाली. नागपुरात थांबलेल्या २८ प्रवाशांनी संपूर्ण रात्र स्टेशनवरच काढली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिक होते. या भाविकांची रेल्वे प्रशासनाने आणि प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. दुपारी २ नंतर रेल्वे प्रशासनाने खासगी वाहतूक एजन्सीसोबत बोलणे करून या भाविकांसाठी खासगी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर हे भाविक आपापल्या गावाकडे रवाना झाल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी