शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर अडकले २८ भाविक : गर्दीमुळे चढू शकले नाही गाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:31 IST

रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने केली जाण्याची व्यवस्था

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले. त्यांना जाण्यासाठी कुठलीही रेल्वेगाडी नव्हती. अखेर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि या भाविकांना त्यांच्या गावाकडे रवाना केले.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील निवासी चंद्रदत्त त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूणू ८० प्रवासी दहा दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला निघाले होते. जगन्नाथपुरी, श्रीशैलम, तिरुपती आदी तीर्थक्षेत्रांच्या दर्शनानंतर दोन दिवसांनी ते रामेश्वरमला पोहोचले. येथून त्यांना अलाहबादला जायचे होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यांच्याजवळ आरक्षणाची रेल्वे तिकिटे होती. मात्र, गाडी मिळत नसल्याने त्यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मिळेल त्या गाडीने ते अलाहबादकरिता निघाले. दरम्यान, ही गाडी अलाहबादला नव्हे तर दिल्लीला जात असल्याचे समजताच ते सर्व भाविक रविवारी नागपुरात उतरले. सकाळी आलेल्या एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. परंतु ८० पैकी ५२ प्रवाशांनाच गाडीत जागा मिळाली. उर्वरित २८ प्रवाशांना नागपुरातच थांबावे लागले. यावेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांची ताटातूट झाली. नागपुरात थांबलेल्या २८ प्रवाशांनी संपूर्ण रात्र स्टेशनवरच काढली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिक होते. या भाविकांची रेल्वे प्रशासनाने आणि प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. दुपारी २ नंतर रेल्वे प्रशासनाने खासगी वाहतूक एजन्सीसोबत बोलणे करून या भाविकांसाठी खासगी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर हे भाविक आपापल्या गावाकडे रवाना झाल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी