शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटीत अडकल्या विहिरी

By admin | Updated: February 22, 2017 02:50 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून त्यांना सुबत्ता यावी, या उदात्त हेतूने राज्य शासन

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : अनेक शेतकरी लाभापासून वंचित काटोल : शेतकऱ्यांना सिंचनाची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून त्यांना सुबत्ता यावी, या उदात्त हेतूने राज्य शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या खोदकाम व बांधकामासाठी अनुदान देते. मात्र, शासनानेच घालून दिलेल्या काही जाचक अटींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना या विहिरी मिळाल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे यांनी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील शेतकरी, भू सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी आणि अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या विहिरींचा लाभ मिळू शकतो. यासाठी लाभार्थ्याकडे किमान ०.६० हेक्टर आर शेती असणे आवश्यक असून, प्रस्तावित विहीर पूर्वी अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फूट अंतरावर असावी, प्रस्तावित विहिरीपासून पाच पोलच्या आत वीजपुरवठा उपलब्ध असावा, लाभार्थ्याकडे तलाठ्याच्या स्वाक्षरीचा एकूण शेतीक्षेत्राचा दाखला असावा, एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर घेत असल्यास त्यांचे एकूण शेतीचे क्षेत्र ०.६० हेक्टरपेक्षा जास्त व सलग असावे, लाभार्थी हा जॉबकार्डधारक असला पाहिजे, त्याने मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे असावे आदी अटी पूर्वी घालण्यात आल्या होत्या. या योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्यांची निवड करून अर्ज पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. सर्व अटी व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना समितीच्यावतीने विहिरी मंजूर केल्या जातात. दरम्यान, शासनाने यातील काही अटींमध्ये बदल करून २१ आॅगस्ट २०१४ रोजी नवीन आदेश जारी केला. नवीन आदेशान्वये दोन विहिरीमधील अंतर किमान १५० मीटर असावे, अशी नवीन अट घालण्यात आली. ही अट केवळ अल्पभूधारक शेतकरी लाभार्थ्यांना लागू केली आहे. या अटी केंद्राने घातल्या आहेत. वास्तवात, अल्पभूधारक अर्थात शेतीचा विचार केल्यास दोन शेतांमधील व त्यातीन विहिरीमधील अंतर कमी असणे स्वाभाविक असल्याने अंतराची अट ही जाचक ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)