शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तिकीट मशीन नसल्याने स्टारबस सेवेत अडथळा

By admin | Updated: April 3, 2017 02:55 IST

नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती.

डीआयएमटीएसच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ४३२ पैकी २०० बसेस रस्त्यावर नागपूर : नागपूर शहरात मार्चपर्यत ४३२ बसेस धावणार असल्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली होती. परंतु प्रत्यक्षात २०० बसेस शहरातील रस्त्यावर धावत आहेत. बसेस कमी असल्याने प्रवासी व विद्यार्थी त्रस्त आहेत. यामुळे शहर वाहतुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लि. (डीआयएमटीएस )यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच कंपनीवर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन उपलब्ध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे स्टारबस सेवेत अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी वंश निमय व स्कॅनिया कंपनीच्या लाल रंगाच्या अशा एकूण ४३२ बसेस शहरातील रस्त्यांवर होत्या. १ मार्च २०१७ पासून शहरातील वाहतूक व्यवस्था नवीन बस आॅपरेटरकडे सोपविण्यात आली. बसेसचे मार्ग निश्चित करणे, कंडक्टरची नियुक्ती, तिकीट विक्रीचा महसूल गोळा करणे व सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्याची जबाबदारी डीआयएमटीएस यांच्यावर सोपविण्यात आली होती. सध्या शहरात २०० बसेस धावत असून प्रत्येक बसला दोन तिकीट मशीनची गरज आहे. परंतु केवळ २०० मशीन उपलब्ध आहेत. यामुळे उर्वरित बसेच उभ्या असल्याने महापालिकेचा महसूल बुडत असल्याची माहिती आहे. बसेसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नाही. त्यातच इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंडक्टरला करावी लागते १६ तास ड्युटी नियमानुसार स्टरबस कंडक्टरची ८ तासांची ड्युटी आहे. परंतु त्यांना १६ तास ड्युटी करावी लागते. आरोग्याचा विचार न करता त्यांना काम करावे लागत आहे. वंश निमय यांनी कमी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत समावून न घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सर्व बसेस धावल्या असत्या तर सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळाले असते. या संदर्भात सहायक कामगार आयुक्तांनीही महापालिका प्रशासनाला फटकारले आहे. साध्या तिकिटाचा वापर का नाही? इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनचा तुटवडा आहे तर साध्या तिकिटांचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या तिकिटांचा वापर केला तर शहरबस सेवेवर याचा परिणाम होणार नाही. शहरातील रस्त्यावर सर्व ४३२ बसेस धावतील. प्रवाशांनाही त्रास होणार नाही. महापालिकेच्या महसुलात वाढ होईल. परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.