शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

एसटीचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:29 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांनी केली दोन खासगी बसेसची तोडफोड : विभागाला ७० लाखाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संपाच्या दुसरा दिवस अखेर नागपूर विभागाला तब्बल ७० लाखाचा फटका बसला.एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर शांतता होती. कर्मचाºयांनी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बस आडव्या लावल्या होत्या. आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. संपाबाबत पुढे काय होणार याबाबत कर्मचारी चर्चा करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी हंसा ट्रॅव्हल्सतर्फे ७०-८० बसेस विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत.यातील एम. एच. ३१, एफ. सी. ०३८२ ही बस रामटेकवरून येत असताना एसटी कर्मचाºयांनी या बसला मनसर टोल नाक्याजवळ थांबवून बसच्या टायरमधील हवा सोडली. त्यामुळे मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली. तर बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए. ६२४४ मनसर-आमडीफाटाजवळ थांबवून त्याची विंडशिल्ड तोडुन एअर प्रेशर लिक केले. या दोन्ही प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.प्रवाशांच्या हितासाठी चालवित आहोत बसेसहंसा ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप छाजेड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे निर्देश आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हंसा ट्रॅव्हल्सच्या ७० ते ८० बसेस प्रवाशांसाठी चालविण्यात येत आहेत.या बसेसमध्ये एसटी महामंडळाचे दरपत्रकही लावण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी करण्यात येणाºया या सेवेच्या विरोधात संप करणाºया एसटी कर्मचाºयांनी पाऊल उचलून बसेसची हवा सोडली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा पुरविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांची गैरसोयएसटी कर्मचाºयांच्या संपाच्या दुसºया दिवशी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक प्रवाशांनी खासगी बसेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यात खासगी बसेसकडूनही अधिक शुल्क आकारण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली. खासगी बसेस ग्रामीण भागात जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना संपाचा अधिक फटका बसला.