शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एसटीचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:29 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांनी केली दोन खासगी बसेसची तोडफोड : विभागाला ७० लाखाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संपाच्या दुसरा दिवस अखेर नागपूर विभागाला तब्बल ७० लाखाचा फटका बसला.एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर शांतता होती. कर्मचाºयांनी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बस आडव्या लावल्या होत्या. आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. संपाबाबत पुढे काय होणार याबाबत कर्मचारी चर्चा करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी हंसा ट्रॅव्हल्सतर्फे ७०-८० बसेस विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत.यातील एम. एच. ३१, एफ. सी. ०३८२ ही बस रामटेकवरून येत असताना एसटी कर्मचाºयांनी या बसला मनसर टोल नाक्याजवळ थांबवून बसच्या टायरमधील हवा सोडली. त्यामुळे मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली. तर बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए. ६२४४ मनसर-आमडीफाटाजवळ थांबवून त्याची विंडशिल्ड तोडुन एअर प्रेशर लिक केले. या दोन्ही प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.प्रवाशांच्या हितासाठी चालवित आहोत बसेसहंसा ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप छाजेड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे निर्देश आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हंसा ट्रॅव्हल्सच्या ७० ते ८० बसेस प्रवाशांसाठी चालविण्यात येत आहेत.या बसेसमध्ये एसटी महामंडळाचे दरपत्रकही लावण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी करण्यात येणाºया या सेवेच्या विरोधात संप करणाºया एसटी कर्मचाºयांनी पाऊल उचलून बसेसची हवा सोडली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा पुरविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांची गैरसोयएसटी कर्मचाºयांच्या संपाच्या दुसºया दिवशी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक प्रवाशांनी खासगी बसेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यात खासगी बसेसकडूनही अधिक शुल्क आकारण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली. खासगी बसेस ग्रामीण भागात जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना संपाचा अधिक फटका बसला.