शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

एसटीचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:29 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांनी केली दोन खासगी बसेसची तोडफोड : विभागाला ७० लाखाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संपाच्या दुसरा दिवस अखेर नागपूर विभागाला तब्बल ७० लाखाचा फटका बसला.एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर शांतता होती. कर्मचाºयांनी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बस आडव्या लावल्या होत्या. आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. संपाबाबत पुढे काय होणार याबाबत कर्मचारी चर्चा करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी हंसा ट्रॅव्हल्सतर्फे ७०-८० बसेस विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत.यातील एम. एच. ३१, एफ. सी. ०३८२ ही बस रामटेकवरून येत असताना एसटी कर्मचाºयांनी या बसला मनसर टोल नाक्याजवळ थांबवून बसच्या टायरमधील हवा सोडली. त्यामुळे मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली. तर बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए. ६२४४ मनसर-आमडीफाटाजवळ थांबवून त्याची विंडशिल्ड तोडुन एअर प्रेशर लिक केले. या दोन्ही प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.प्रवाशांच्या हितासाठी चालवित आहोत बसेसहंसा ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप छाजेड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे निर्देश आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हंसा ट्रॅव्हल्सच्या ७० ते ८० बसेस प्रवाशांसाठी चालविण्यात येत आहेत.या बसेसमध्ये एसटी महामंडळाचे दरपत्रकही लावण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी करण्यात येणाºया या सेवेच्या विरोधात संप करणाºया एसटी कर्मचाºयांनी पाऊल उचलून बसेसची हवा सोडली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा पुरविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांची गैरसोयएसटी कर्मचाºयांच्या संपाच्या दुसºया दिवशी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक प्रवाशांनी खासगी बसेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यात खासगी बसेसकडूनही अधिक शुल्क आकारण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली. खासगी बसेस ग्रामीण भागात जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना संपाचा अधिक फटका बसला.