शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

एसटीची स्वेच्छानिवृत्ती योजना अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात ५० वर्षे व त्यावरील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीची जितकी वर्षे ...

नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात ५० वर्षे व त्यावरील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीची जितकी वर्षे शिल्लक असतील त्या प्रत्येक वर्षासाठी केवळ तीन महिन्यांचेच वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना अन्यायकारक असून यातील अटीत बदल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एसटीच्या ज्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे, त्यांंच्यासाठी एसटी महामंडळाने स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहीर केली आहे. यात कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या मोबदल्यात केवळ तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात असंतोष पसरला आहे. किमान स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची जितकी वर्षे शिल्लक असतील त्यासाठी प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन द्यावे आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला एसटीत नोकरी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्वेच्छानिवृत्तीची योजना हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी एसटीतील संघटनांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणे गरजेचे होते. त्यामुळे महामंडळाच्या प्रशासनाने संघटनांना विश्वासात न घेता ही योजना जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून या योजनेत बदल करण्याची मागणी कर्मचारी आणि संघटना करीत आहेत.

प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन द्यावे

‘ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या उमेदीचा काळ महामंडळासाठी दिला त्यांना स्वेच्छानिवृत्ती देताना केवळ तीन महिन्यांचे वेतन देणे चुकीचे आहे. त्यामुळे महामंडळाची ही योजना फसवी आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिल्लक असलेल्या वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला आठ महिन्यांचे वेतन आणि वारसास नोकरी देण्याची गरज आहे.’

-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)