शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

नागपूर, अमरावती विभागांत विकासावरून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

कमल शर्मा नागपूर : विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर नागपूर व अमरावती विभागांत संघर्ष निर्माण झाला आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व ...

कमल शर्मा

नागपूर : विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर नागपूर व अमरावती विभागांत संघर्ष निर्माण झाला आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाचा अधिक विकास झाला असल्याचा दावा केला जात असून, या संघर्षाचे हेच मुख्य कारण आहे. या संघर्षामुळेच २०११ पासून विभागीय स्तरावरील उपसमिती बनू शकलेली नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळे या मंडळाचा कार्यकाळ वाढविण्याच्या मागणीसोबतच विदर्भात आता विभागीय उपसमिती स्थापन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्राचा समतोल प्रादेशिक विकास निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हे तिन्ही विकास मंडळ १५ महिन्यांपासून अस्तित्वहीन झाले आहेत. ३० एप्रिल २०२० रोजी तिन्ही विकास मंडळांचा कार्यकाळ समाप्त झाला. मंडळाच्या कार्यकाळ वाढविण्यास अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला तरच या मंडळाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. राजकीय पक्षांसोबतच विदर्भवादीही आता मंडळ स्थापनेच्या समर्थनार्थ पुढे आली आहेत. यासोबतच विदर्भ विकास मंडळाच्या अंतर्गत नागपूर व अमरावती विभागांसाठी उपसमिती स्थापन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या मागणीचे समर्थन करणारे असा दावा करीत आहेत की, ६ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन राज्य सरकारने एक अध्यादेश जारी करीत केवळ उर्वरित विकास मंडळासाठी विभागीय स्तरावरील उपसमिती स्थापन केली. विदर्भातही उपसमितीच्या स्थापनेची मागणी होत होती; परंतु राज्य सरकारने कुठलाही पुढाकार घेतला नाही. २०१४ मध्ये आलेल्या भाजप सरकारने या दिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. विदर्भातच ‘नागपूर विरुद्ध अमरावती’ असा संघर्ष वाढू नये म्हणून सरकारने समिती स्थापन केली नसल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे.

काय आहे कारण?

- नागपूर विभागात सिचंनाचा आर्थिक अनुशेष समाप्त; परंतु अमरावती विभागात १,७९,४७७ हेक्टरचे अनुशेष शिल्लक. अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत समस्या कायम.

- दोन्ही विभागांतील लोकसंख्येत फारसा फरक नाही. तरीही नागपूर विभागात विजेची मागणी अमरावती विभागापेक्षा चार पटींनी अधिक आहे. अमरावती विभागात औद्योगिकीकरण कमी असल्याचे यावरून दिसून येते.

- नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागातील एमआयडीसीमध्ये कमी उद्योग आहेत; यामुळे येथे बेरोजगारीसुद्धा अधिक आहे.

- नागपूर विभागात तीन विशेष आर्थिक झोन मंजूर झाले होते; परंतु अमरावती विभागात एकही नाही.

- नागपूर विभागात दोन आयटी पार्क विकसित झाले. अमरावतीमध्ये एकही नाही.

- २००१ ते २०२१ रस्ते विकास योजनेचे नागपुरात ८२ टक्के लक्ष्य प्राप्त झाले. अमरावती विभागात ६८ टक्केच प्राप्त झाले.

- नागपूर विभागात आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी, लॉ युनिव्हर्सिटी यांसारख्या शैक्षणिक संस्था आल्या. अमरावती विभागात केवळ शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज व कृषी विद्यापीठ आहे.

- बॉक्स

- विदर्भावर मोठा अन्याय

नागपूर विदर्भाचे हृदय आहे. त्यामुळे त्याचा विकासाचा आनंदच आहे; परंतु अमरावती विभागात त्या तुलनेत विकास होऊ शकलेला नाही. सरकारला पश्चिम विदर्भाकडेही लक्ष देऊन विभागीय स्तरावर समतोल विकास करायला हवा.

- डॉ. संजय खडक्कार

माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ

बॉक्स

- पूर्ण विदर्भावरच झाला अन्याय

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत संपूर्ण विदर्भावरच अन्याय झाला. आता पूर्व आणि पश्चिम विदर्भाची तुलना केली तर विदर्भात एकता नाही, असा संदेश जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील नेते याचा फायदा उचलतील.

- कपिल चंद्रायण, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ