शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, अमरावती विभागांत विकासावरून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

कमल शर्मा नागपूर : विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर नागपूर व अमरावती विभागांत संघर्ष निर्माण झाला आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व ...

कमल शर्मा

नागपूर : विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर नागपूर व अमरावती विभागांत संघर्ष निर्माण झाला आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाचा अधिक विकास झाला असल्याचा दावा केला जात असून, या संघर्षाचे हेच मुख्य कारण आहे. या संघर्षामुळेच २०११ पासून विभागीय स्तरावरील उपसमिती बनू शकलेली नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळे या मंडळाचा कार्यकाळ वाढविण्याच्या मागणीसोबतच विदर्भात आता विभागीय उपसमिती स्थापन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्राचा समतोल प्रादेशिक विकास निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हे तिन्ही विकास मंडळ १५ महिन्यांपासून अस्तित्वहीन झाले आहेत. ३० एप्रिल २०२० रोजी तिन्ही विकास मंडळांचा कार्यकाळ समाप्त झाला. मंडळाच्या कार्यकाळ वाढविण्यास अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला तरच या मंडळाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. राजकीय पक्षांसोबतच विदर्भवादीही आता मंडळ स्थापनेच्या समर्थनार्थ पुढे आली आहेत. यासोबतच विदर्भ विकास मंडळाच्या अंतर्गत नागपूर व अमरावती विभागांसाठी उपसमिती स्थापन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या मागणीचे समर्थन करणारे असा दावा करीत आहेत की, ६ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन राज्य सरकारने एक अध्यादेश जारी करीत केवळ उर्वरित विकास मंडळासाठी विभागीय स्तरावरील उपसमिती स्थापन केली. विदर्भातही उपसमितीच्या स्थापनेची मागणी होत होती; परंतु राज्य सरकारने कुठलाही पुढाकार घेतला नाही. २०१४ मध्ये आलेल्या भाजप सरकारने या दिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. विदर्भातच ‘नागपूर विरुद्ध अमरावती’ असा संघर्ष वाढू नये म्हणून सरकारने समिती स्थापन केली नसल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे.

काय आहे कारण?

- नागपूर विभागात सिचंनाचा आर्थिक अनुशेष समाप्त; परंतु अमरावती विभागात १,७९,४७७ हेक्टरचे अनुशेष शिल्लक. अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत समस्या कायम.

- दोन्ही विभागांतील लोकसंख्येत फारसा फरक नाही. तरीही नागपूर विभागात विजेची मागणी अमरावती विभागापेक्षा चार पटींनी अधिक आहे. अमरावती विभागात औद्योगिकीकरण कमी असल्याचे यावरून दिसून येते.

- नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागातील एमआयडीसीमध्ये कमी उद्योग आहेत; यामुळे येथे बेरोजगारीसुद्धा अधिक आहे.

- नागपूर विभागात तीन विशेष आर्थिक झोन मंजूर झाले होते; परंतु अमरावती विभागात एकही नाही.

- नागपूर विभागात दोन आयटी पार्क विकसित झाले. अमरावतीमध्ये एकही नाही.

- २००१ ते २०२१ रस्ते विकास योजनेचे नागपुरात ८२ टक्के लक्ष्य प्राप्त झाले. अमरावती विभागात ६८ टक्केच प्राप्त झाले.

- नागपूर विभागात आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटी, लॉ युनिव्हर्सिटी यांसारख्या शैक्षणिक संस्था आल्या. अमरावती विभागात केवळ शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज व कृषी विद्यापीठ आहे.

- बॉक्स

- विदर्भावर मोठा अन्याय

नागपूर विदर्भाचे हृदय आहे. त्यामुळे त्याचा विकासाचा आनंदच आहे; परंतु अमरावती विभागात त्या तुलनेत विकास होऊ शकलेला नाही. सरकारला पश्चिम विदर्भाकडेही लक्ष देऊन विभागीय स्तरावर समतोल विकास करायला हवा.

- डॉ. संजय खडक्कार

माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ

बॉक्स

- पूर्ण विदर्भावरच झाला अन्याय

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत संपूर्ण विदर्भावरच अन्याय झाला. आता पूर्व आणि पश्चिम विदर्भाची तुलना केली तर विदर्भात एकता नाही, असा संदेश जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील नेते याचा फायदा उचलतील.

- कपिल चंद्रायण, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ