शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

‘एनव्हीसीसी’चा टाळेबंदीला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सोमवारी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी घोषित करून अत्यावश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सोमवारी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयाला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कडाडून विरोध दर्शवला आहे.

नागपूर शहरात फेब्रुवारी २०२१ पासून टाळेबंदी सुरू आहे. त्यात राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही टाळेबंदी वाढवली आहे. यामुळे व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळणार असल्याची भीती मेहाडिया यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी टाळेबंदीचा सर्वाधिक फटका लहान व मध्यम व्यापाऱ्यांना बसला आहे. सरकारने अर्थसंकल्पात लहान व मध्यम व्यापाऱ्यांसाठी कोणतेच विशेष पॅकेज जाहीर केले नाही. व्यापारी वर्गाला कर सवलतही दिली गेली नाही. मात्र, कर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर नियम लागू केले आणि दंडवृद्धी केली आहे. सोबतच टाळेबंदीत वीज बिल, टेलिफोन बिल आणि अन्य बिले भरावी लागली. टाळेबंदीच्या नावाने दुकाने बंद असतील, तर व्यापारी वर्ग कर आणि बिल भरणार कसे, असा सवाल मेहाडिया यांनी उपस्थित केला आहे.

व्यापारी वर्ग कर भरत असल्यानेच शासकीय कोषागार भरलेला असतो. त्यावरच सरकारचा कारभार चालतो. व्यापारच बंद असेल तर व्यापारी कर कुठून भरणार, असा सवाल चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनी केला आहे. सरकारने टाळेबंदीत उद्योग जगताला आंशिक निर्बंधांसह सवलत प्रदान केली आहे. मात्र, सगळे निर्बंध केवळ व्यापारी वर्गालाच का लागू होतात? उद्योग जगतातून वस्तू निर्माण होत राहतील आणि त्याउलट ठोक व किरकोळ बाजार बंद असेल, तर वस्तूंची विक्री कशी होईल? विशेष म्हणजे, टाळेबंदीत बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु, निर्माणासंबंधीत दुकानेच बंद असतील, तर निर्माण कार्य कसे होईल, याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी तोतला यांनी केली आहे.

या सगळ्या स्थितीचा विचार करताना पूर्णत: टाळेबंदीचा निर्णय परत घ्यावा आणि नागरिकांवर कठोर निर्बंध लावून व नियमांची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सने केली आहे. बाजार आणि व्यापार बंद असेल, तर व्यापारी कोरोना महामारीने नाही, तर टाळेबंदीमुळे आर्थिक संकटाने मरणार आहे. त्यामुळे, टाळेबंदी न करता नियमांतर्गत व्यापार सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

...............