शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

कडाक्याचे ऊन अन् छत हिरावले

By admin | Updated: May 22, 2015 02:45 IST

एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले.

मनपाने तोडली घासबजार झोपडपट्टी : १५० संसार उघड्यावरनागपूर : ‘मे हीट’ने जोर धरला आहे. सूर्य आग ओकतो आहे. पारा ४७ अंशावर पोहोचला आहे. एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले. गुरुवारी भरदुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील तब्बल १५० झोपड्या तोडल्या. त्यामुळे सर्वांचे संसार उघड्यावर आले. झोपडपट्टीवासीयांना उन्हाचे चटके सहन करीत आपल्या सामानाची आवराआवर करावी लागली. एवढ्या कडक उन्हात डोक्यावरचे छत गेले असताना आता विसावा कुठे घ्यायचा, असा सवाल या झोपडपट्टीवासीयांनी केला आहे. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महापालिकेचे पथक या झोपडपट्टीत पोहोचले व एकाएक बुलडोझरने झोपड्या तोडण्यास सुरुवात झाली. नागरिक झोपड्या सोडण्यास तयार नव्हते. त्यांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून झोपडीधारकांना बाहेर काढण्यात आले व झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आला. काही झोपडीधारकांना तर झोपडीतील सामान बाहेर काढण्यासाठीही वेळ मिळाला नाही. संबंधित झोपडपट्टी ५० वर्षांपूर्वीची असल्याचा येथील रहिवाशांचा दावा आहे. अनेकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आहे. ही सर्व कागदपत्रे दाखवूनही पथकाने कारवाई केली. याचा नागरिकांनी निषेध केला. या वेळी पथकाने झोपडपट्टीला लागून असलेले एक धार्मिक स्थळ तोडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कारवाईदरम्यान झोपडीधारकांमध्ये एकच धावपळ सुरू होती. लहान मुलांना झाडाखाली बसवून अनेक जण भरउन्हात आपल्या सामानांची जमवाजमव करीत होते. तुटलेल्या झोपडीचे सामान गोळा करीत होते. म्हाताऱ्या नागरिकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला. महिलांची पाण्यासाठी धावाधाव सुरू होती. डोक्यावरील छत गेल्यामुळे महिलांसह पुरुषांच्या डोळ्यातही अश्रू होते. आता एवढ्या उन्हात आम्ही कुठे राहायचे, असा सवाल ते हुंदके देत करीत होते. (प्रतिनिधी)झोपडपट्टी वसलेली संबंधित जागा महापालिकेची असल्याचा दावा लकडगंज झोनच्या अधिकाऱ्यांनी केला. महापालिकेच्या या मैदानावर झोपडीधारकांना अनधिकृत घरे बांधून नंतर ते स्थायी करून घ्यायचे आहे. दोन वर्षांपूर्वी येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा झोपड्या बांधण्यात आल्या, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.