शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

ताण वाढतोय...

By admin | Updated: July 23, 2016 02:57 IST

जिल्हा न्यायालयातील नवीन सहायक सरकारी वकिलांची यादी अडल्याने आणि १३ सरकारी

सरकारी वकिलांची यादी अडली : कामकाज सुरळीत होणार कधी ? राहुल अवसरे नागपूर जिल्हा न्यायालयातील नवीन सहायक सरकारी वकिलांची यादी अडल्याने आणि १३ सरकारी वकिलांचा कार्यकाळ संपून महिना लोटत असल्याने फौजदारी प्रकरणे चालविणाऱ्या न्यायालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा न्यायालयात एकूण ४० सरकारी वकील होते. त्यापैकी १३ सरकारी वकिलांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २ जुलै रोजीच संपलेला आहे. त्यामुळे ते आता सरकारी वकील नसल्याने त्यांच्याकडे असलेली प्रकरणे त्यांनी परत केलेली आहेत. प्रत्येकांची सरासरी १५ प्रकरणे ही सध्या कार्यरत असलेल्या २७ सरकारी वकिलांकडे आलेली आहेत. अर्थात कार्यकाळ संपलेल्या सरकारी वकिलांची ही प्रकरणे कार्यरत सरकारी वकिलांकडे आल्याने प्रत्येकांकडे एकूणच प्रकरणांचा बोझा वाढलेला आहे. नव्याने आलेली ही प्रकरणे समजण्यासाठी वेळ लागत असल्याने ‘ तारीख पे तारीख’, ची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यायालयांच्या कामकाजांवर मोठा परिणाम झालेला आहे. कार्यकाळ संपल्याच्या कारणामुळे परत करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये बहुतांश प्रकरणे जामिनाची आहेत. काही प्रकरणे साक्षीपुराव्यांची तर काही खटल्याच्या अंतिम टप्प्यातील युक्तिवादाची आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी वकिलांच्या पदभरतीसाठी जिल्हाधिकारी आणि विधी सचिवांनी मुलाखती घेतल्या होत्या. त्यापैकी निवड झालेल्या काही सरकारी वकिलांना रुजू करून घेण्यात आलेले आहे. काही प्रतीक्षा यादीवर आहेत. सरकारी वकिलांच्या नवीन यादीमध्ये प्रतीक्षा यादीतील सरकारी वकिलांचा समावेश अपेक्षित आहे. ही यादी २ जुलै रोजीच जाहीर होणार होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधी व न्याय मंत्रालयाचा कार्यभारही आहे. परंतु ते परदेश दौऱ्यावर गेल्याने ही यादी अडली. आता तर विधिमंडळ अधिवेशन सुरू झालेले आहे. त्यामुळे पुन्हा ही यादी अडली आहे. सरकारी वकिलांच्या नवीन नेमणुका अडल्याने ‘जलद न्यायदान’ या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.