शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रस्त्यावर, हॉटेल्समध्ये मिळतो विकतचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 20:17 IST

Nagpur News भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कॅन्सर, हृदयविकाराचाही धोकाखाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात. हॉटेलचालकांकडून असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते,परंतु नागपुरात या कारवाईला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांवर रस्त्यावरील व हॉटेल्समधून विकत घेणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विकतचा आजार मिळत आहे.

-वर्षभरात एकावरही कारवाई नाही

ज्या अन्न व्यावसायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. ‘एफडीए’कडून वारंवार हॉटेल्सची तपासणी केली जाते, परंतु वर्षभरात एकावरही कारवाई झालेली नाही.

-तर होऊ शकतात हे आजार

डॉक्टरांनुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास अशा तेलात ‘फ्री रेडिकल्स’ तयार होतात. हे ‘रेडिकल्स’ आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने ‘ॲथेरोस्कॉलरोसिस’ होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचाही धोका असतो.

-तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तसेच उरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही नोंद ठेवते कोण? आणि गंभीरतेने तपासते कोण? हा प्रश्न आहे.

-तेलातील टीपीसी हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कारवाई

तळण्यासाठीच्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जाऊन तपासणी केली जाते. ‘टीपीसी मीटर’च्या मदतीने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी केली जाते. जर तेलातील ‘टीपीसी’ हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अभय देशपांडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.

टॅग्स :foodअन्न