शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

रस्त्यावर, हॉटेल्समध्ये मिळतो विकतचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 20:17 IST

Nagpur News भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कॅन्सर, हृदयविकाराचाही धोकाखाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात. हॉटेलचालकांकडून असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते,परंतु नागपुरात या कारवाईला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांवर रस्त्यावरील व हॉटेल्समधून विकत घेणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विकतचा आजार मिळत आहे.

-वर्षभरात एकावरही कारवाई नाही

ज्या अन्न व्यावसायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. ‘एफडीए’कडून वारंवार हॉटेल्सची तपासणी केली जाते, परंतु वर्षभरात एकावरही कारवाई झालेली नाही.

-तर होऊ शकतात हे आजार

डॉक्टरांनुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास अशा तेलात ‘फ्री रेडिकल्स’ तयार होतात. हे ‘रेडिकल्स’ आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने ‘ॲथेरोस्कॉलरोसिस’ होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचाही धोका असतो.

-तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तसेच उरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही नोंद ठेवते कोण? आणि गंभीरतेने तपासते कोण? हा प्रश्न आहे.

-तेलातील टीपीसी हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कारवाई

तळण्यासाठीच्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जाऊन तपासणी केली जाते. ‘टीपीसी मीटर’च्या मदतीने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी केली जाते. जर तेलातील ‘टीपीसी’ हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अभय देशपांडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.

टॅग्स :foodअन्न