शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

रस्त्यावर, हॉटेल्समध्ये मिळतो विकतचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 20:17 IST

Nagpur News भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कॅन्सर, हृदयविकाराचाही धोकाखाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात. हॉटेलचालकांकडून असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते,परंतु नागपुरात या कारवाईला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांवर रस्त्यावरील व हॉटेल्समधून विकत घेणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विकतचा आजार मिळत आहे.

-वर्षभरात एकावरही कारवाई नाही

ज्या अन्न व्यावसायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. ‘एफडीए’कडून वारंवार हॉटेल्सची तपासणी केली जाते, परंतु वर्षभरात एकावरही कारवाई झालेली नाही.

-तर होऊ शकतात हे आजार

डॉक्टरांनुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास अशा तेलात ‘फ्री रेडिकल्स’ तयार होतात. हे ‘रेडिकल्स’ आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने ‘ॲथेरोस्कॉलरोसिस’ होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचाही धोका असतो.

-तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तसेच उरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही नोंद ठेवते कोण? आणि गंभीरतेने तपासते कोण? हा प्रश्न आहे.

-तेलातील टीपीसी हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कारवाई

तळण्यासाठीच्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जाऊन तपासणी केली जाते. ‘टीपीसी मीटर’च्या मदतीने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी केली जाते. जर तेलातील ‘टीपीसी’ हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अभय देशपांडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.

टॅग्स :foodअन्न