शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रस्त्यावर, हॉटेल्समध्ये मिळतो विकतचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 20:17 IST

Nagpur News भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात.

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कॅन्सर, हृदयविकाराचाही धोकाखाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर

नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर ते आरोग्याला अपायकारक ठरतात. हॉटेलचालकांकडून असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते,परंतु नागपुरात या कारवाईला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांवर रस्त्यावरील व हॉटेल्समधून विकत घेणाऱ्या खाद्यपदार्थांमधून विकतचा आजार मिळत आहे.

-वर्षभरात एकावरही कारवाई नाही

ज्या अन्न व्यावसायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. ‘एफडीए’कडून वारंवार हॉटेल्सची तपासणी केली जाते, परंतु वर्षभरात एकावरही कारवाई झालेली नाही.

-तर होऊ शकतात हे आजार

डॉक्टरांनुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास अशा तेलात ‘फ्री रेडिकल्स’ तयार होतात. हे ‘रेडिकल्स’ आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने ‘ॲथेरोस्कॉलरोसिस’ होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचाही धोका असतो.

-तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण?

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाची नोंद ठेवणे आवश्यक असते. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले, तसेच उरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु ही नोंद ठेवते कोण? आणि गंभीरतेने तपासते कोण? हा प्रश्न आहे.

-तेलातील टीपीसी हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कारवाई

तळण्यासाठीच्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जाऊन तपासणी केली जाते. ‘टीपीसी मीटर’च्या मदतीने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी केली जाते. जर तेलातील ‘टीपीसी’ हे २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अभय देशपांडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता.

टॅग्स :foodअन्न