शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरातील खाऊगल्लीचे ९२ लाख पाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:24 IST

प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ९२ लाख खर्च करून गांधीसागर तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उभारण्यात आलेले डोम वापराविना असल्याने नादुरुस्त होत असल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउद्घाटनापूर्वीच दुरुस्तीच्या मार्गावरमनपाच्या उत्पन्नात वाढ कशी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिक ट असल्याने यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ९२ लाख खर्च करून गांधीसागर तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उभारण्यात आलेले डोम वापराविना असल्याने नादुरुस्त होत असल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीचे तत्कालनी अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी घेतला होता. वर्षभरानंतर तत्कालीन अध्यक्ष बंडू राऊ त यांच्या प्रयत्नांनी येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राज्य सरोवरे संवर्धन प्रस्तावात गांधीसागर तलावाचा समावेश आहे. यात गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. याचा विचार करता खाऊ गल्लीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावर जवळपास ९२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. वापर नसल्याने काही डोमचे स्लॅब निघण्याला सुरुवात झाली आहे. वास्तविक खाऊ गल्लीच्या माध्यमातून भाडे स्वरुपात महापालिकेला वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून डोमचा वापर होत नसल्याने दुरुस्तीला आले आहे. प्रशासनाची अशीच उदासीन भूमिका असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात भर कशी पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक भाड्यामुळे प्रतिसाद नाहीखाऊ गल्ली येथील अजूनही काही कामे शिल्लक आहे. रास्त भाडे आकारावे खाऊ गल्लीतील स्टॉल दरमहिना १० हजार रुपये भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु यासोबतच वीज व पाणी बिलाची रक्कम संबंधित व्यावसायिक ांना भरावी लागणार आहे. अशा प्रकारे महिन्याला २५ हजारांच्या आसपास खर्च होईल. ही रक्कम मोठी असल्याने खाऊ गल्लीतील डोम भाड्याने घेण्याला अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे रास्त भाडे आकारण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र यात दरमहा १० हजार भाडे प्रस्तावित आहे. तसेच पाणी व वीज बील वेगळे भरावयाचे असल्याने व्यावसायिकांचा याला अपेक्षित प्रतिसाद नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार