शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नागपुरातील खाऊगल्लीचे ९२ लाख पाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:24 IST

प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ९२ लाख खर्च करून गांधीसागर तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उभारण्यात आलेले डोम वापराविना असल्याने नादुरुस्त होत असल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउद्घाटनापूर्वीच दुरुस्तीच्या मार्गावरमनपाच्या उत्पन्नात वाढ कशी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिक ट असल्याने यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ९२ लाख खर्च करून गांधीसागर तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उभारण्यात आलेले डोम वापराविना असल्याने नादुरुस्त होत असल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीचे तत्कालनी अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी घेतला होता. वर्षभरानंतर तत्कालीन अध्यक्ष बंडू राऊ त यांच्या प्रयत्नांनी येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राज्य सरोवरे संवर्धन प्रस्तावात गांधीसागर तलावाचा समावेश आहे. यात गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. याचा विचार करता खाऊ गल्लीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावर जवळपास ९२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. वापर नसल्याने काही डोमचे स्लॅब निघण्याला सुरुवात झाली आहे. वास्तविक खाऊ गल्लीच्या माध्यमातून भाडे स्वरुपात महापालिकेला वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून डोमचा वापर होत नसल्याने दुरुस्तीला आले आहे. प्रशासनाची अशीच उदासीन भूमिका असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात भर कशी पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक भाड्यामुळे प्रतिसाद नाहीखाऊ गल्ली येथील अजूनही काही कामे शिल्लक आहे. रास्त भाडे आकारावे खाऊ गल्लीतील स्टॉल दरमहिना १० हजार रुपये भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु यासोबतच वीज व पाणी बिलाची रक्कम संबंधित व्यावसायिक ांना भरावी लागणार आहे. अशा प्रकारे महिन्याला २५ हजारांच्या आसपास खर्च होईल. ही रक्कम मोठी असल्याने खाऊ गल्लीतील डोम भाड्याने घेण्याला अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे रास्त भाडे आकारण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र यात दरमहा १० हजार भाडे प्रस्तावित आहे. तसेच पाणी व वीज बील वेगळे भरावयाचे असल्याने व्यावसायिकांचा याला अपेक्षित प्रतिसाद नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार