शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जवळचे झाले होते परके, मग परक्याने निभावली दोस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार प्रवीण खापरे / लोकमत ...

- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ना रक्ताचे नाते, ना जन्माचे बंध तरी असतो अर्ध्या रात्री सज्ज... हा भाव मैत्रीचा. दोस्ती ही निर्मळ, नि:स्वार्थ वृत्तीतून जन्माला येते. जणू संकटकाळी धावणारा देवच तो. कधीकाळी हा देव फार ओळखीचा नसतो किंवा दीर्घ परिचयाचाही नसतो. येतो, निर्लेप वृत्तीने सहकार्य करतो आणि अदृष्य होतो, पुन्हा कधी भेटेल याची गॅरंटीही नसते. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असे अनेक देव अचानक अवतरले आणि मैत्रीच्या रूपाने आपले कर्तव्य पार पाडून अचानक अदृष्यही झाले. त्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाचा उल्लेख करावा लागेल.

२०२० मध्ये आलेल्या संक्रमणाच्या पहिल्या लाटेत जवळपास ७०० रुग्ण आणि २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत साधारत: १२०० रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अहोरात्र मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाने केले. त्यांच्याकडून सेवेचे शुल्क घेतले नाही असे नाही. मात्र, जवळपास अर्ध्याअधिक रुग्णांना त्यांची तत्कालीन आर्थिक स्थिती पाहून काहीच न मागता सेवापूर्तीचा भाव आपल्या व्हॅलेटमध्ये जमा करून निघून जाण्यातच कर्तव्यबुद्धी मानली. विशेष म्हणजे, संक्रमणाच्या धास्तीने रुग्णाचा एकही नातेवाईक सोबत नसताना, हे कार्य मंगेश यांनी पार पाडले. संक्रमणाचा अतिउद्वेग असण्याच्या काळात तर बेड्सची चणचण निर्माण झाली होती. त्या काळात रुग्णांना बेड मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या मंगेश यांनी रुग्णवाहिकेतच प्राण सोडताना अनेक रुग्ण बघितले. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही पूर्वजन्मीचा पुत्र म्हणून किंवा दोस्त म्हणून पार पाडली. निर्मोही वृत्तीने आपल्या जन्माचे कर्तव्य पार पाडणारा महाभारतकालीन मित्र श्रीकृष्ण जसा होता, तो. भाव मंगेश बढे यांच्या वृत्तीतून दिसतो.

एका क्षणात नाती निर्माण होतात

मी अमरावती येथील माेर्शी तालुक्यातील निंबी गावचा. आई-वडील शेतकरी व भजन-कीर्तनात रमलेले असतात. मी गेल्या १६ वर्षांपासून नागपुरात रुग्णवाहिका चालवितो. घरातील सारगर्भीत संस्कारांमुळे निर्माण झालेल्या वृत्तीला भाळून एका स्वयंसेवी संस्थेने मला रुग्णवाहिका दिली आणि कार्य करण्यास प्रोत्साहन दिले. दररोज भेटणाऱ्या रुग्णांच्या सुख-दु:खाच्या कथनातून एका क्षणात नाते निर्माण होते. जणू मागच्या जन्माचे नाते असावे, असे भासते. मात्र, भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने आपले कर्तव्य पार पाडल्यावर पुन्हा कधी रुग्णाची भेट होऊ नये असेच वाटते.

- मंगेश बढे, रुग्णवाहिका चालक

...............