शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

जवळचे झाले होते परके, मग परक्याने निभावली दोस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार प्रवीण खापरे / लोकमत ...

- मंगेश बढे ठरले रुग्णांचा आधार : कुणाकडून घेतले नाही शुल्क, कुणाचे केले एकट्यानेच अंत्यसंस्कार

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ना रक्ताचे नाते, ना जन्माचे बंध तरी असतो अर्ध्या रात्री सज्ज... हा भाव मैत्रीचा. दोस्ती ही निर्मळ, नि:स्वार्थ वृत्तीतून जन्माला येते. जणू संकटकाळी धावणारा देवच तो. कधीकाळी हा देव फार ओळखीचा नसतो किंवा दीर्घ परिचयाचाही नसतो. येतो, निर्लेप वृत्तीने सहकार्य करतो आणि अदृष्य होतो, पुन्हा कधी भेटेल याची गॅरंटीही नसते. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असे अनेक देव अचानक अवतरले आणि मैत्रीच्या रूपाने आपले कर्तव्य पार पाडून अचानक अदृष्यही झाले. त्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाचा उल्लेख करावा लागेल.

२०२० मध्ये आलेल्या संक्रमणाच्या पहिल्या लाटेत जवळपास ७०० रुग्ण आणि २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत साधारत: १२०० रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अहोरात्र मंगेश बढे या रुग्णवाहिका चालकाने केले. त्यांच्याकडून सेवेचे शुल्क घेतले नाही असे नाही. मात्र, जवळपास अर्ध्याअधिक रुग्णांना त्यांची तत्कालीन आर्थिक स्थिती पाहून काहीच न मागता सेवापूर्तीचा भाव आपल्या व्हॅलेटमध्ये जमा करून निघून जाण्यातच कर्तव्यबुद्धी मानली. विशेष म्हणजे, संक्रमणाच्या धास्तीने रुग्णाचा एकही नातेवाईक सोबत नसताना, हे कार्य मंगेश यांनी पार पाडले. संक्रमणाचा अतिउद्वेग असण्याच्या काळात तर बेड्सची चणचण निर्माण झाली होती. त्या काळात रुग्णांना बेड मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या मंगेश यांनी रुग्णवाहिकेतच प्राण सोडताना अनेक रुग्ण बघितले. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही पूर्वजन्मीचा पुत्र म्हणून किंवा दोस्त म्हणून पार पाडली. निर्मोही वृत्तीने आपल्या जन्माचे कर्तव्य पार पाडणारा महाभारतकालीन मित्र श्रीकृष्ण जसा होता, तो. भाव मंगेश बढे यांच्या वृत्तीतून दिसतो.

एका क्षणात नाती निर्माण होतात

मी अमरावती येथील माेर्शी तालुक्यातील निंबी गावचा. आई-वडील शेतकरी व भजन-कीर्तनात रमलेले असतात. मी गेल्या १६ वर्षांपासून नागपुरात रुग्णवाहिका चालवितो. घरातील सारगर्भीत संस्कारांमुळे निर्माण झालेल्या वृत्तीला भाळून एका स्वयंसेवी संस्थेने मला रुग्णवाहिका दिली आणि कार्य करण्यास प्रोत्साहन दिले. दररोज भेटणाऱ्या रुग्णांच्या सुख-दु:खाच्या कथनातून एका क्षणात नाते निर्माण होते. जणू मागच्या जन्माचे नाते असावे, असे भासते. मात्र, भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने आपले कर्तव्य पार पाडल्यावर पुन्हा कधी रुग्णाची भेट होऊ नये असेच वाटते.

- मंगेश बढे, रुग्णवाहिका चालक

...............