शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अजबच; केवळ सल्ला देण्यासाठी दररोज मिळणार २५ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:38 IST

Nagpur News महाराष्ट्र सरकारच्या महापारेषण कंपनीत सल्लागारांच्या नियुक्तांमध्ये अजबच प्रकार घडला आहे. कंपनीने तांत्रिक विशेतज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती तर केली पण आतापर्यंत मानधनासोबतच जबाबदारी व सेवा अटी निश्चित झालेल्या नाहीत.

ठळक मुद्दे महापारेषणमध्ये सल्लागारांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्हनियुक्ती दिली, पण मानधन, जबाबदारी निश्चित नाही

कमल शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या महापारेषण कंपनीत सल्लागारांच्या नियुक्तांमध्ये अजबच प्रकार घडला आहे. कंपनीने तांत्रिक विशेतज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती तर केली पण आतापर्यंत मानधनासोबतच जबाबदारी व सेवा अटी निश्चित झालेल्या नाहीत. दुसरीकडे डिस्पॅच सेंटरला सल्ला देण्यासाठी नियुक्त सल्लागाराला दररोज २५ हजार रुपये देण्यात येणार आहे. चहा, नाश्ता, जेवण आणि वाहनासाठी वेगळा भत्ता मिळणार आहे.

महापारेषणने कंपनीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दीपक रोकडे यांना तांत्रिकी विशेषज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि नियुक्तीपत्रही दिले. पण आतापर्यंत त्यांच्या मानधनावर निर्णय झालेला नाही. सल्लागार म्हणून रोकडे यांना काय करायचे आहे, याची जबाबदारी नंतर निश्चित होईल तसेच मानधन व अन्य सुविधांची माहिती नंतर देण्यात येईल, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे. राज्यात एखाद्या सरकारी कंपनीत या प्रकारे कुणाला जबाबदारी देण्याचे हे प्रकरण असेल.

दुसरीकडे लोड डिस्पॅच सेंटरमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केलेले पेंटय्या पोलांगनी यांना दररोज २५ हजार रुपये देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यांना दैनिक भत्त्यावर एक वर्षासाठी नियुक्त केले आहे. चहा, नाश्ता, वाहन आदींचा खर्च कंपनी करेल आणि विमानाने येण्या-जाण्याची सुविधाही मिळेल, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे.

नियमानुसार नियुक्ती : ऊर्जा सचिव

राज्याचे ऊर्जा सचिव व महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे म्हणाले, या नियुक्त्या नियमानुसार झाल्या आहेत. पेंटय्या पोलांगनी यांचे लोड डिस्पॅच क्षेत्रात देशातच नव्हे तर जगात मोठे नाव आहे. ते कंपनीशी जुळले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. दुसरे सल्लागार दीपक रोकडे संदर्भात म्हणाले, ते कंपनीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आहेत. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही.

नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्या : पहाडे

महाराष्ट्र वीज कामगार संघाचे महामंत्री शंकर पहाडे यांनी या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी करून महापारेषणच्या व्यवस्थापकीय संचालकाला पत्र लिहिले आहे. एक वर्षासाठी झालेल्या या नियुक्त्या नियमानुसार झालेल्या नाहीत. महापारेषणमध्ये प्रशिक्षित अधिकारी आहेत. ते योग्यरीत्या काम करीत आहेत. त्यामुळे सल्लागारांची उपयोगिता खरचं आहे का? आर्थिक संकटात फसलेल्या कंपनीने खर्च वाढविणे योग्य नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरण