शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पेंचमध्ये ‘एसटीपीएफ’च्या बदलीचे वादळ

By admin | Updated: March 4, 2017 02:12 IST

सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे.

एनटीसीएचे नियम धाब्यावर : पेंचमधून थेट पुणे वनवृत्तात बदली जीवन रामावत   नागपूर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे. नागपूर वन विभागाने येथील एका एसटीपीएफ जवानाची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून थेट पुणे वनवृत्तात बदली केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एनटीसीएच्या गाईडलाईननुसार कोणत्याही एसटीपीएफ जवानाची वयाच्या ४० वर्षापर्यंत दुसरीकडे बदली करता येत नाही. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि राजकीय दबावात ही बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. अनिल वामन राठोड, असे त्या बदली झालेल्या जवानाचे नाव आहे. जंगलातील वाघांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र फौज असावी, त्यांचा शिकाऱ्यांवर थेट वॉच असावा आणि देशातील वाघांची संख्या वाढावी, या हेतूने ‘एसटीपीएफ’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार २०१२ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी ८० लोकांची एसटीपीएफमध्ये नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून एसटीपीएफची फौज पेंच व्याघ्र प्रकल्पात तैनात आहेत. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या राठोड यांच्या बदलीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, पेंचमधील एसटीपीएफ नेहमीच अन्यायाचा सामना करीत आले आहे. २४ तास जंगलात तैनात असलेल्या या जवानांना कधीच आवश्यक सोई-सुविधा मिळाल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांची केवळ व्याघ्र संरक्षणासाठी नियुक्ती झाली असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांचा बोजा टाकण्यात आला आहे. यातच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गेटवर चक्क काही एसटीपीएफ जवानांना पर्यटकांकडून तिकीट फाडण्यासाठी काऊंटरवर बसविण्यात आले होते. मात्र असे असताना यामधील सर्व तरुण नवीन असल्याने आतापर्यंत ते सर्व मुकाटपणे अन्याय सहन करीत होते, परंतु आता त्यांनी आवाज उठविला असून, जर एका एसटीपीएफ जवानाची पुणे वनवृत्तात बदली होत असेल, तर आमची का नाही? असा प्रश्न उपस्थित करून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या बदल्यांचे अर्ज सादर केले आहेत. एसटीपीएफ जवानांच्या या आक्रमक भूमिकेने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय चांगलेच हादरले आहे. शिवाय एनटीसीएच्या नियमांना न जुमानता राठोड यांच्या बदलीसाठी शिफारस करणारा वन अधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘एसटीपीएफ’च्या ट्रेनिंगचा बोजवारा माहिती सूत्रानुसार पेंचमधील एसटीपीएफ जवानांच्या प्रशिक्षणाचा (ट्रेनिंगचा) बोजवारा वाजला आहे. नियमानुसार या सर्व एसटीपीएफ जवानांना प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे अनिवार्य आहे. मात्र पेंचमधील एसटीपीएफ जवानांचे मागील तीन वर्षांत केवळ एक ट्रेनिंग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मग ही फौज बहेलियासारख्या सराईत शिकाऱ्यांशी दोन हात कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच या जवानांचे नियमानुसार प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण का झाले नाही, आणि त्यासाठी कोण जबाबदार आहेत, याची पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचा विश्वासघात! उप वनसंरक्षक, नागपूर कार्यालयाने २०१२ मध्ये या सर्व ८० तरुणांची ‘वनरक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्ती आदेशसुद्धा वनरक्षक म्हणूनच देण्यात आले आहे. परंतु रुजू झाल्यानंतर त्यांना विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, चंद्रपूर, मेळघाट आणि नवेगाव-नागझीरा येथील एसटीपीएफच्या पदभरतीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्घ करून, तेथील तरुणांना वनरक्षक (विशेष व्याघ्र संरक्षण दल) असेच नियुक्ती पत्रसुद्धा देण्यात आले आहे. मात्र पेंचमधील या तरुणांच्या नियुक्तीसाठी तशाप्रकारची कोणतीही जाहिरात देण्यात आलेली नव्हती, तर त्यांची वनरक्षकांच्या पदभरतीतून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेंचमधील एसटीपीएफ जवान हा आमच्यावर अन्याय असून, वन विभागाने आमचा विश्वासघात केला असल्याचा संताप व्यक्त करीत आहे. सोबतच अनेकांनी त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.