शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

पेंचमध्ये ‘एसटीपीएफ’च्या बदलीचे वादळ

By admin | Updated: March 4, 2017 02:12 IST

सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे.

एनटीसीएचे नियम धाब्यावर : पेंचमधून थेट पुणे वनवृत्तात बदली जीवन रामावत   नागपूर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे. नागपूर वन विभागाने येथील एका एसटीपीएफ जवानाची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून थेट पुणे वनवृत्तात बदली केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एनटीसीएच्या गाईडलाईननुसार कोणत्याही एसटीपीएफ जवानाची वयाच्या ४० वर्षापर्यंत दुसरीकडे बदली करता येत नाही. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि राजकीय दबावात ही बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. अनिल वामन राठोड, असे त्या बदली झालेल्या जवानाचे नाव आहे. जंगलातील वाघांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र फौज असावी, त्यांचा शिकाऱ्यांवर थेट वॉच असावा आणि देशातील वाघांची संख्या वाढावी, या हेतूने ‘एसटीपीएफ’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार २०१२ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी ८० लोकांची एसटीपीएफमध्ये नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून एसटीपीएफची फौज पेंच व्याघ्र प्रकल्पात तैनात आहेत. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या राठोड यांच्या बदलीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, पेंचमधील एसटीपीएफ नेहमीच अन्यायाचा सामना करीत आले आहे. २४ तास जंगलात तैनात असलेल्या या जवानांना कधीच आवश्यक सोई-सुविधा मिळाल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांची केवळ व्याघ्र संरक्षणासाठी नियुक्ती झाली असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांचा बोजा टाकण्यात आला आहे. यातच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गेटवर चक्क काही एसटीपीएफ जवानांना पर्यटकांकडून तिकीट फाडण्यासाठी काऊंटरवर बसविण्यात आले होते. मात्र असे असताना यामधील सर्व तरुण नवीन असल्याने आतापर्यंत ते सर्व मुकाटपणे अन्याय सहन करीत होते, परंतु आता त्यांनी आवाज उठविला असून, जर एका एसटीपीएफ जवानाची पुणे वनवृत्तात बदली होत असेल, तर आमची का नाही? असा प्रश्न उपस्थित करून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या बदल्यांचे अर्ज सादर केले आहेत. एसटीपीएफ जवानांच्या या आक्रमक भूमिकेने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय चांगलेच हादरले आहे. शिवाय एनटीसीएच्या नियमांना न जुमानता राठोड यांच्या बदलीसाठी शिफारस करणारा वन अधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘एसटीपीएफ’च्या ट्रेनिंगचा बोजवारा माहिती सूत्रानुसार पेंचमधील एसटीपीएफ जवानांच्या प्रशिक्षणाचा (ट्रेनिंगचा) बोजवारा वाजला आहे. नियमानुसार या सर्व एसटीपीएफ जवानांना प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे अनिवार्य आहे. मात्र पेंचमधील एसटीपीएफ जवानांचे मागील तीन वर्षांत केवळ एक ट्रेनिंग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मग ही फौज बहेलियासारख्या सराईत शिकाऱ्यांशी दोन हात कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच या जवानांचे नियमानुसार प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण का झाले नाही, आणि त्यासाठी कोण जबाबदार आहेत, याची पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचा विश्वासघात! उप वनसंरक्षक, नागपूर कार्यालयाने २०१२ मध्ये या सर्व ८० तरुणांची ‘वनरक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्ती आदेशसुद्धा वनरक्षक म्हणूनच देण्यात आले आहे. परंतु रुजू झाल्यानंतर त्यांना विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, चंद्रपूर, मेळघाट आणि नवेगाव-नागझीरा येथील एसटीपीएफच्या पदभरतीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्घ करून, तेथील तरुणांना वनरक्षक (विशेष व्याघ्र संरक्षण दल) असेच नियुक्ती पत्रसुद्धा देण्यात आले आहे. मात्र पेंचमधील या तरुणांच्या नियुक्तीसाठी तशाप्रकारची कोणतीही जाहिरात देण्यात आलेली नव्हती, तर त्यांची वनरक्षकांच्या पदभरतीतून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेंचमधील एसटीपीएफ जवान हा आमच्यावर अन्याय असून, वन विभागाने आमचा विश्वासघात केला असल्याचा संताप व्यक्त करीत आहे. सोबतच अनेकांनी त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.