शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पेंचमध्ये ‘एसटीपीएफ’च्या बदलीचे वादळ

By admin | Updated: March 4, 2017 02:12 IST

सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे.

एनटीसीएचे नियम धाब्यावर : पेंचमधून थेट पुणे वनवृत्तात बदली जीवन रामावत   नागपूर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे. नागपूर वन विभागाने येथील एका एसटीपीएफ जवानाची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून थेट पुणे वनवृत्तात बदली केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एनटीसीएच्या गाईडलाईननुसार कोणत्याही एसटीपीएफ जवानाची वयाच्या ४० वर्षापर्यंत दुसरीकडे बदली करता येत नाही. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि राजकीय दबावात ही बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. अनिल वामन राठोड, असे त्या बदली झालेल्या जवानाचे नाव आहे. जंगलातील वाघांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र फौज असावी, त्यांचा शिकाऱ्यांवर थेट वॉच असावा आणि देशातील वाघांची संख्या वाढावी, या हेतूने ‘एसटीपीएफ’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार २०१२ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी ८० लोकांची एसटीपीएफमध्ये नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून एसटीपीएफची फौज पेंच व्याघ्र प्रकल्पात तैनात आहेत. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या राठोड यांच्या बदलीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, पेंचमधील एसटीपीएफ नेहमीच अन्यायाचा सामना करीत आले आहे. २४ तास जंगलात तैनात असलेल्या या जवानांना कधीच आवश्यक सोई-सुविधा मिळाल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांची केवळ व्याघ्र संरक्षणासाठी नियुक्ती झाली असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांचा बोजा टाकण्यात आला आहे. यातच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गेटवर चक्क काही एसटीपीएफ जवानांना पर्यटकांकडून तिकीट फाडण्यासाठी काऊंटरवर बसविण्यात आले होते. मात्र असे असताना यामधील सर्व तरुण नवीन असल्याने आतापर्यंत ते सर्व मुकाटपणे अन्याय सहन करीत होते, परंतु आता त्यांनी आवाज उठविला असून, जर एका एसटीपीएफ जवानाची पुणे वनवृत्तात बदली होत असेल, तर आमची का नाही? असा प्रश्न उपस्थित करून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या बदल्यांचे अर्ज सादर केले आहेत. एसटीपीएफ जवानांच्या या आक्रमक भूमिकेने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय चांगलेच हादरले आहे. शिवाय एनटीसीएच्या नियमांना न जुमानता राठोड यांच्या बदलीसाठी शिफारस करणारा वन अधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘एसटीपीएफ’च्या ट्रेनिंगचा बोजवारा माहिती सूत्रानुसार पेंचमधील एसटीपीएफ जवानांच्या प्रशिक्षणाचा (ट्रेनिंगचा) बोजवारा वाजला आहे. नियमानुसार या सर्व एसटीपीएफ जवानांना प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे अनिवार्य आहे. मात्र पेंचमधील एसटीपीएफ जवानांचे मागील तीन वर्षांत केवळ एक ट्रेनिंग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मग ही फौज बहेलियासारख्या सराईत शिकाऱ्यांशी दोन हात कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच या जवानांचे नियमानुसार प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण का झाले नाही, आणि त्यासाठी कोण जबाबदार आहेत, याची पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचा विश्वासघात! उप वनसंरक्षक, नागपूर कार्यालयाने २०१२ मध्ये या सर्व ८० तरुणांची ‘वनरक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्ती आदेशसुद्धा वनरक्षक म्हणूनच देण्यात आले आहे. परंतु रुजू झाल्यानंतर त्यांना विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, चंद्रपूर, मेळघाट आणि नवेगाव-नागझीरा येथील एसटीपीएफच्या पदभरतीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्घ करून, तेथील तरुणांना वनरक्षक (विशेष व्याघ्र संरक्षण दल) असेच नियुक्ती पत्रसुद्धा देण्यात आले आहे. मात्र पेंचमधील या तरुणांच्या नियुक्तीसाठी तशाप्रकारची कोणतीही जाहिरात देण्यात आलेली नव्हती, तर त्यांची वनरक्षकांच्या पदभरतीतून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेंचमधील एसटीपीएफ जवान हा आमच्यावर अन्याय असून, वन विभागाने आमचा विश्वासघात केला असल्याचा संताप व्यक्त करीत आहे. सोबतच अनेकांनी त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.