शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. ...

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. त्यानंतर लागलीच सोमवारी उमरेडच्या आठवडी बाजाराचा दिवस असतो. दोन दिवसाच्या बंदनंतर सोमवारी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इतवारी मुख्य बाजार तसेच लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील भाजीबाजारात तुफान गर्दी उसळली होती. काही जणांनी केवळ दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क घातले होते. असंख्य नागरिकांनी ‘मास्क’ला हनुवटीवरच ठेवणे पसंत केले. काही नागरिकांनी मास्क घातलेच नव्हते. ठराविक अंतराच्या नियमाला तर धाब्यावरच बसविल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले.

आठवडी बाजारात उमरेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ते भिवापूर आणि कुही तालुक्यातीलही लगतच्या गावांमधील हजारो नागरिक येत असतात. नागपूर, कामठी, मौदा आदी ठिकाणांहून ठोक व्यापारीही याठिकाणी येत असतात. या कारणामुळे सोमवारी हजारो नागरिकांची गर्दी छोट्याशा इतवारी परिसरात दिसून आली. तालुका व्यवस्थापन समितीने यावर गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मागील काही दिवसापासून उमरेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चारचौघात वावरताना नागरिक अजूनही गंभीर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसाच्या बंदमुळे सोमवारसह अन्य दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी उसळते. यामुळे शनिवार आणि रविवार बंदच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

नियमावली कठोर करा

आता कुठे व्यवसायाला गती येत होती, अशातच दोन दिवसाच्या बंदमुळे छोट्या व्यावसायिकांसह अनेकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असाच कटू अनुभव आम्हास येत असून आर्थिक फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया अक्षय खानोरकर, सतीश चौधरी, प्रशांत गाडेकर, गिरीश लेंडे, क्षितिज खानोरकर, सचिन कुहीकर, मनोज सदावर्ती, राम आदमने, मुकेश अग्रवाल, अशोक लांजेवार, नितीन डुंभरे, सुमित गजभिये आदींनी व्यक्त केल्या. दोन दिवसाचा व्यापार बंदचा प्रकार बंद करण्यात यावा. वेळेत काही बदल करावयाचा असल्यास तोसुद्धा करण्यात यावा. नियमावली अधिक कठोर करावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

-----

यात डोके कुणाचे?

सोमवारी आठवडी बाजार गावतलावानजीक जुन्या बैलबाजारात भरत होता. अशातच दोन आठवड्यापासून अतिशय अरुंद असलेल्या इतवारी मुख्य भाजीबाजारात हा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या बैलबाजारनजीक सर्व सुविधांयुक्त भव्य परिसरात आठवडी बाजार भरतो. असे असताना अचानकपणे त्या परिसरातील बाजार बंद करून इतवारी मुख्य बाजारात बाजार भरविण्याचा निर्णय घेतला कुणी, असा सवाल विचारला जात आहे.