शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाच्या बंदनंतर उसळली तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. ...

उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने उमरेड येथे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बाजारपेठ बंदसाठी घोषित केले आहेत. त्यानंतर लागलीच सोमवारी उमरेडच्या आठवडी बाजाराचा दिवस असतो. दोन दिवसाच्या बंदनंतर सोमवारी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इतवारी मुख्य बाजार तसेच लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील भाजीबाजारात तुफान गर्दी उसळली होती. काही जणांनी केवळ दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क घातले होते. असंख्य नागरिकांनी ‘मास्क’ला हनुवटीवरच ठेवणे पसंत केले. काही नागरिकांनी मास्क घातलेच नव्हते. ठराविक अंतराच्या नियमाला तर धाब्यावरच बसविल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले.

आठवडी बाजारात उमरेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ते भिवापूर आणि कुही तालुक्यातीलही लगतच्या गावांमधील हजारो नागरिक येत असतात. नागपूर, कामठी, मौदा आदी ठिकाणांहून ठोक व्यापारीही याठिकाणी येत असतात. या कारणामुळे सोमवारी हजारो नागरिकांची गर्दी छोट्याशा इतवारी परिसरात दिसून आली. तालुका व्यवस्थापन समितीने यावर गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मागील काही दिवसापासून उमरेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चारचौघात वावरताना नागरिक अजूनही गंभीर दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसाच्या बंदमुळे सोमवारसह अन्य दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी उसळते. यामुळे शनिवार आणि रविवार बंदच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

नियमावली कठोर करा

आता कुठे व्यवसायाला गती येत होती, अशातच दोन दिवसाच्या बंदमुळे छोट्या व्यावसायिकांसह अनेकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असाच कटू अनुभव आम्हास येत असून आर्थिक फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया अक्षय खानोरकर, सतीश चौधरी, प्रशांत गाडेकर, गिरीश लेंडे, क्षितिज खानोरकर, सचिन कुहीकर, मनोज सदावर्ती, राम आदमने, मुकेश अग्रवाल, अशोक लांजेवार, नितीन डुंभरे, सुमित गजभिये आदींनी व्यक्त केल्या. दोन दिवसाचा व्यापार बंदचा प्रकार बंद करण्यात यावा. वेळेत काही बदल करावयाचा असल्यास तोसुद्धा करण्यात यावा. नियमावली अधिक कठोर करावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

-----

यात डोके कुणाचे?

सोमवारी आठवडी बाजार गावतलावानजीक जुन्या बैलबाजारात भरत होता. अशातच दोन आठवड्यापासून अतिशय अरुंद असलेल्या इतवारी मुख्य भाजीबाजारात हा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या बैलबाजारनजीक सर्व सुविधांयुक्त भव्य परिसरात आठवडी बाजार भरतो. असे असताना अचानकपणे त्या परिसरातील बाजार बंद करून इतवारी मुख्य बाजारात बाजार भरविण्याचा निर्णय घेतला कुणी, असा सवाल विचारला जात आहे.