शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सारस पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातून नामशेष?, चार वर्षांपासून दर्शनच नाही

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 17, 2023 17:58 IST

वन विभागाची हायकोर्टात माहिती

नागपूर : प्रेमाचे प्रतीक समजले जाणारे दुर्मिळ सारस पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातून नामशेष झाल्याचे संकेत मिळाले आहेत. या जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी केवळ एक सारस पक्षी दिसून येत होता. परंतु, त्यानंतर येथे एकही सारस पक्षाचे दर्शन झाले नाही. परिणामी, यावर्षी येथे सारस पक्ष्यांचे सर्वेक्षणच करण्यात आले नाही.

वन विभागाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, यावर्षी केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातच सारस पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्याचे आले. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात ३१ तर, भंडारा जिल्ह्यात ४ सारस पक्षी आढळून आले आहेत. त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

भरपाईसाठी तीन लाखाची तरतूद

सारस पक्ष्यांच्या घरट्यांमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आवश्यक भरपाई देण्यासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रस्ताव मंजूर होतपर्यंत भरपाईची तात्पुरती सोय म्हणून नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी आहे. सारस पक्षी नसल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला यातून वगळण्यात आले आहे.

'लोकमत'च्या बातमीवरून जनहित याचिका

उच्च न्यायालयाने सारस पक्ष्याच्या संवर्धनाकरिता २०२१ मध्ये 'लोकमत'च्या बातमीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वन विभागाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले व इतर मुद्दे विचारात घेण्यासाठी याचिकेवर २३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. ॲड. राधिका बजाज यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, ॲड. कार्तिक शुकुल यांनी वन विभागाच्या वतीने कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयchandrapur-acचंद्रपूर