शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मिहान प्रकल्पग्रस्तांचे रास्ता रोको

By admin | Updated: March 2, 2015 02:29 IST

पुनर्वसनाशी संबंधित मागण्यांबाबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीने रविवारी...

नागपूर : पुनर्वसनाशी संबंधित मागण्यांबाबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीने रविवारी दुपारी वर्धा मार्गावरील शिवणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर समितीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेतली. कुंभारे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले, असे समितीचे सचिव नटराज पिल्लई यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांना १५०० चौ.फू. भूखंड व १० लाखाचा मोबदला द्यावा, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, आरोग्य सेवेच्या सवलती आणि रोजगाराचे प्रशिक्षण तसेच रोजगार सुरू करण्यासाठी ४० लाखाचे कर्ज द्यावे, आदी समितीच्या मागण्या आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी उपोषण आणि मोर्चेही काढले. तीनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ व त्यात समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करू, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली असून, प्रकल्पग्रस्तांना १५०० ऐवजी फक्त १००० चौ.फू. भूखंड देण्याचा निर्णय झाला आहे. समितीशी चर्चा न करताच कार्यवाही सुरू केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळावी आणि त्यात समितीच्या मागण्यांसंदर्भात चर्चा व्हावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे, असे पिल्लई यांनी सांगितले. शासनाकडून मिळालेले आश्वासन पाळल्या गेले नाही तर ८ तारखेपासून उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकते अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. आंदोलनाचे नेतृत्व पिल्लई यांच्यासह संजय बोडे, हेमरुन, सुभाष अंबोरकर आणि रोहित जयस्वाल यांनी केले.स्वाईन फ्लू उपचारविक्तुबाबानगरात स्वाईन फ्लूची साथ पसरत असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी या भागात विशेष शिबिर सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे पिल्लई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)