शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाव लगेच जाहीर करणे थांबवावे

By admin | Updated: March 30, 2016 03:03 IST

बलात्काराच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण होतपर्यंत किंवा तपास अधिकारी लिखित स्वरूपात परवानगी देतपर्यंत वृत्तवाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी आरोपीचे नाव जाहीर करू नये,

हायकोर्टात याचिका : तक्रारीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही विनंतीनागपूर : बलात्काराच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण होतपर्यंत किंवा तपास अधिकारी लिखित स्वरूपात परवानगी देतपर्यंत वृत्तवाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी आरोपीचे नाव जाहीर करू नये, महिलेच्या तक्रारीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे आणि तक्रार खोटी आढळून आल्यास संबंधित महिला कारवाईस पात्र राहील असा नवीन नियम छापील ‘एफआयआर’मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकेत केंद्रीय माहिती व प्रसारण विभाग, प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव, पोलीस आयुक्त व अजनी पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.राजेंद्र पडोळे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते व्यावसायिक आहेत. त्यांच्याविरुद्ध एका महिलेने २७ जुलै २०१५ रोजी अजनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली आहे. ही तक्रार खोटी असल्याचा व महिलेने ५५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी ही तक्रार नोंदविल्याचा पडोळे यांचा दावा आहे. त्यांनी खंडणीच्या तक्रारीची सीबीआय किंवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यासाठी व महिलेच्या खोट्या तक्रारीमुळे झालेल्या मानसिक त्रासाचा मोबदला मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून वरील विनंतीही न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास व अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)बलात्काराच्या खोट्या तक्रारी वाढल्यागेल्या काही वर्षांपासून बलात्काराच्या खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध हेतूने या तक्रारी केल्या जातात. याप्रकरणात आरोपीविरुद्ध ताबडतोब एफआयआर नोंदविणे बंधनकारक आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदविल्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे बातम्या प्रसारित केल्या जातात. यामुळे आरोपीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. समाजामध्ये त्याची बदनामी होते. यानंतर आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटला तरी, त्याची पूर्वीची प्रतिष्ठा परत येत नाही. समाज त्याच्याकडे चांगल्या नजरेने पहात नाही. त्याला जगणे असह्य होऊन जाते. परिणामी ही याचिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.