शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : गेल्या आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. आणखी काही दिवस पावसाने उघडीप ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : गेल्या आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. आणखी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यास पिकांना जगविण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. परंतु सिंचनाची सुविधा असतानाही वीजपुरवठ्याअभावी पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. कारण महावितरणने कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवा, अन्यथा तीव्र आंदाेलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमाेद घरडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.

ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे, हा महावितरण पर्यायाने शासनाचा तुघलकी निर्णय आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्य सरकारविराेधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रमाेद घरडे यांनी दिला आहे. एकीकडे गेल्या दीड वर्षापासून काेराेना महामारीमुळे सर्वत्र संकटांचा सामना करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांनादेखील समस्या व अडचणींना सामाेरे जावे लागले. लाॅकडाऊनदरम्यान आमदार, खासदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू हाेते. मात्र गाेरगरीब शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे. अशावेळी ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करणे, अन्यायकारक आहे.

सद्यस्थितीत शेतात साेयाबीन, मिरची, धानाची पऱ्हे डाेलत आहेत. पावसाने दांडी मारल्याने बहुतांश पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. शेतात माेटारपंप आहे, परंतु वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना जगविण्यासाठी शासनाने कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी घरडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात वीज कंपनीच्या मांढळ ग्रामीण कार्यालयाचे वीज अभियंता पाटील यांना विचारणा केली असता, ज्या गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिल थकीत आहे, तेथील विद्युत डीपीची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे वीजपुरवठा बंद राहताे. ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.