शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अवैध दारूचे धंदे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:09 IST

उमरेड : दारूबंदीचा ठराव पारित केल्यानंतर साधारणत: तीन वर्षे गावात दारूची दुकाने बंद होती. अशातच पुन्हा तीन वर्षांपासून तीन ...

उमरेड : दारूबंदीचा ठराव पारित केल्यानंतर साधारणत: तीन वर्षे गावात दारूची दुकाने बंद होती. अशातच पुन्हा तीन वर्षांपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारूचा सपाटा सुरू झाला. यामध्ये एका अवैध देशी दारूच्या दुकानाचाही समावेश आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले असून, हे अवैध धंदे बंद करा, अशी मागणी हिवरा-हिवरी येथील महिलांनी केली आहे.

१,५०० लोकवस्ती असलेल्या हिवरा-हिवरी गावात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा फोफावला आहे. यामुळे गावातील त्रस्त महिलांनी याविरोधात कंबर कसली आहे. नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी याबाबत स्वतंत्रपणे बैठक आयोजित केली. अवैध दारू धंद्यांमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली असून, आता पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत या महिलांनी व्यक्त केले. तरुणी-महिलांना यांनाही त्रास सोसावा लागत असून, जगणे मुश्कील होत असल्याच्या वेदनासुद्धा यावेळी काही महिलांनी मांडल्या. अवैध धंदे बंद करा, अशी मागणी आमदार राजू पारवे यांच्याकडे करण्यात आली आहे. मनीषा कन्नाके, कलावती मोंढे, अलका खोंडे, सुषमा मोंढे, सविता कोल्हे, कल्पना मेश्राम, पपिता मोंढे, माला डंभारे, सविता कोराम, कविता बोडे, सुनंदा पाल, प्रभा तांगडे, सुंदर झाडे, संगीता शेंडे, कल्पना मुळे, उषा मेश्राम आदींसह शेकडो महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

--

शाळकरी मुलं आणि तरुण

अलीकडे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शाळकरी मुलं, महाविद्यालयातील तरुण दिवसभर घर, परिसरात असतात. कोरोनामुळे शिक्षणाचे दरवाजेच बंद असल्याने ही मुलं-तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. ज्या मुलांना अभ्यासाचा ओढा होता, ती मुलं आता या अवैध दारूच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. पोलीस यंत्रणेला याबाबतची इत्थंभूत माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही, असाही आरोप या महिलांचा आहे.

--

भरचौकात मारहाण

अवैध दारूच्या दुकानांमुळे गावात भांडण, वादविवाद आणि भर चौकात मारहाणीचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अश्लील शब्दात बोलणाऱ्या एका दारूड्याला बेदम मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. अतिशय मग्रुरीची आणि चिखलफेक करणारी भाषा वापरल्याने या दारूड्याला काहींनी चांगलेच धुतले. वारंवार घडणाऱ्या या घडामोडींमुळे गावात अशांतता निर्माण होत आहे.