शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 11:14 IST

महाविकास आघाडी सरकारमुळे रखडले होते मेट्रो फेज-२ व नागनदी प्रकल्प

नागपूर : राज्यात लव्ह जिहादचा कायदा येणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात सरकारकडून पावले उचलली जाणार, असे कयास लावण्यात येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

लव्ह जिहादच्या कायद्यासंदर्भात पडताळणी करतो आहे. कायदा आणण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा अभ्यास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते नागपुरात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा मार्ग विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल. केंद्राने मेट्रोच्या फेज-२ तसेच नागनदी शुद्धिकरण प्रकल्पालादेखील मान्यता दिली आहे. मुळात यासंदर्भात आमचे सरकार असताना २०१९ मध्येच प्रस्ताव केंद्राकडे पाठविले होते. त्यात काही लहान त्रुटी काढण्यात आल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांत महाविकासआघाडीच्या सरकारने त्या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी काहीच पावले उचलली नाही. अखेर आम्ही परत सत्तेत आल्यावर त्या त्रुटी दूर करून प्रस्ताव परत पाठविले. केंद्राने अवघ्या चार आठवड्यांत प्रकल्पांना मंजुरी दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण