शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांत व्यक्त व्हावे

By admin | Updated: February 27, 2017 02:11 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे.

माहिती आयुक्त दिलीप धारुरकर : जनसंवाद विभागात परिषद नागपूर : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे. या संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांनी व्यक्त झाल्यास त्याचा लोकशाहीच्या बळकटीकरणास नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नागपूर विभाग माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केले. ते वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम, टीव्ही पत्रकार सरिता कौशिक, विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांची उपस्थिती होती. काळानुरूप माध्यमांमध्ये स्थित्यंतरे होत असताना एक पत्रकार म्हणून आपण त्याची चर्चा केली पाहिजे. तसेच त्या स्थित्यंतरांचे समाजावर होणाऱ्या परिणामांची समीक्षा करणेही गरजेचे असते. पत्रकारांनी समीक्षा न केल्यास समाजातील इतर घटक त्याची समीक्षा करतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठी पत्रकारितेत अनेकवेळा स्थित्यंतरे आली आणि सामाजिक चळवळीही त्याच वेळी घडून गेल्या, असे दिलीप धारुरकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाहीचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यावरील मर्यादांची जाणीव असणे आणि ती करून देणे हेही तितकेच आवश्यक आहे. सोशल मीडियावर शब्द जपून वापरावेत, अवमानकारक, इतरांना दुखावणारे, महापुरुषांची अवमानना करणारी भाषा वापरू नये. तसेच बेजबाबदार आणि अविश्वसनीय, अंधश्रद्धा पसरवणारे आणि आक्षेपार्ह प्रकटीकरणही लोकशाही आणि सुदृढ समाजासाठी घातक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी नवमाध्यमे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महोत्सव असल्याचे सांगून, यासोबत आपल्या सर्वांवर लोकशाही मजबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यमान स्थितीत पत्रकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपात व्यक्त करावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ लोकशाही अपेक्षित होती. ती प्रस्थापित न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते, असेही डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)