शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांत व्यक्त व्हावे

By admin | Updated: February 27, 2017 02:11 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे.

माहिती आयुक्त दिलीप धारुरकर : जनसंवाद विभागात परिषद नागपूर : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे. या संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांनी व्यक्त झाल्यास त्याचा लोकशाहीच्या बळकटीकरणास नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नागपूर विभाग माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केले. ते वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम, टीव्ही पत्रकार सरिता कौशिक, विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांची उपस्थिती होती. काळानुरूप माध्यमांमध्ये स्थित्यंतरे होत असताना एक पत्रकार म्हणून आपण त्याची चर्चा केली पाहिजे. तसेच त्या स्थित्यंतरांचे समाजावर होणाऱ्या परिणामांची समीक्षा करणेही गरजेचे असते. पत्रकारांनी समीक्षा न केल्यास समाजातील इतर घटक त्याची समीक्षा करतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठी पत्रकारितेत अनेकवेळा स्थित्यंतरे आली आणि सामाजिक चळवळीही त्याच वेळी घडून गेल्या, असे दिलीप धारुरकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाहीचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यावरील मर्यादांची जाणीव असणे आणि ती करून देणे हेही तितकेच आवश्यक आहे. सोशल मीडियावर शब्द जपून वापरावेत, अवमानकारक, इतरांना दुखावणारे, महापुरुषांची अवमानना करणारी भाषा वापरू नये. तसेच बेजबाबदार आणि अविश्वसनीय, अंधश्रद्धा पसरवणारे आणि आक्षेपार्ह प्रकटीकरणही लोकशाही आणि सुदृढ समाजासाठी घातक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी नवमाध्यमे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महोत्सव असल्याचे सांगून, यासोबत आपल्या सर्वांवर लोकशाही मजबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यमान स्थितीत पत्रकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपात व्यक्त करावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ लोकशाही अपेक्षित होती. ती प्रस्थापित न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते, असेही डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)