शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

उपराजधानीत राज्य कुणाचे

By admin | Updated: October 7, 2015 03:17 IST

नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी.

क्राईम ग्राफ वाढतोय : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही लोकमत विशेषनागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क असायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्यासारखी झाली आहे. गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव सध्या आजारी रजेवर आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मोलाची भूमिका वठविणारे राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आयुक्तांचा प्रभार आहे. त्यांच्या साथीला शांतपणे कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आहेत. अभिनाशकुमार, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, शैलेश बलकवडे सारखे नव्या दमाचे पोलीस उपायुक्त आहेत. असे असूनही शहरातील गुंड, जुगारी आणि बुकी मोकाट सुटल्यासारखी स्थिती आहे, असे का होत आहे, ते कळायला मार्ग नाही.अधिकारी दडपणात आहे का ? गेल्या दोन दिवसांपासूनं नागपुरात असलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून लोकाभिमुख होऊन काम करावे, असे म्हटले आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा असा सल्ला देतानाच कुणाच्या दडपणात काम करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या सूचनेत अनेक अर्थ दडले आहेत. त्याचमुळे शहरात अनेक चांगले पोलीस अधिकारी असूनही गुन्हेगारी वाढत असल्याने या अधिकाऱ्यांवर दडपण आहे का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक मोठ्या कारवायांच्या वेळी काही पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. हे दडपण ‘त्या’ प्रकरणापुरतेच होते की कायम या अधिकाऱ्यांना दडपणात ठेवण्यात येते, की हे अधिकारीच आता ‘कुछ कर दिखाना नही’, अशा मानसिकतेतून जात आहे, ते तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, पण... राज्याप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वत:च्या गृहशहराकडेही लक्ष आहे. येथील वातावरण चांगले राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते खास नजर ठेवून असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रचितीही आली. दहशतवादी हल्ला किंवा जातीय दंगलीचा धोका असल्यामुळे त्यांनी नागपूरवर बारीक लक्ष ठेवले होते. येथे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी यांना येथे खास पाठवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असेच लक्ष नेहमी ठेवण्याची गरज आहे. शहरातील निष्क्रिय, भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला, त्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले गेले तरच गुन्हेगारांची पिलावळ वळवळणार नाही. खून, बलात्कार, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करण्यासोबत पत्रकारांवर हल्ले करण्याची, धमकी देण्याची, सामान्यजनांची वाहने जाळण्याची, उद्योजकांवर हल्ले करण्याची गुंड हिंमत करणार नाहीत.येथे मिळाले यश!एकीकडे गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना पोलिसांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे शहरातील चेनस्रॅचिंगच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात नागपुरात चेनस्रॅचर्सनी अक्षरश: हैदोस घातला होता. दरदिवशी किमान दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. परिणामी महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी नियोजनपूर्ण कारवाई केल्यामुळे चेनस्रॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीस प्रशंसेला पात्र ठरतात.