शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत राज्य कुणाचे

By admin | Updated: October 7, 2015 03:17 IST

नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी.

क्राईम ग्राफ वाढतोय : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही लोकमत विशेषनागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क असायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्यासारखी झाली आहे. गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव सध्या आजारी रजेवर आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मोलाची भूमिका वठविणारे राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आयुक्तांचा प्रभार आहे. त्यांच्या साथीला शांतपणे कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आहेत. अभिनाशकुमार, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, शैलेश बलकवडे सारखे नव्या दमाचे पोलीस उपायुक्त आहेत. असे असूनही शहरातील गुंड, जुगारी आणि बुकी मोकाट सुटल्यासारखी स्थिती आहे, असे का होत आहे, ते कळायला मार्ग नाही.अधिकारी दडपणात आहे का ? गेल्या दोन दिवसांपासूनं नागपुरात असलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून लोकाभिमुख होऊन काम करावे, असे म्हटले आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा असा सल्ला देतानाच कुणाच्या दडपणात काम करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या सूचनेत अनेक अर्थ दडले आहेत. त्याचमुळे शहरात अनेक चांगले पोलीस अधिकारी असूनही गुन्हेगारी वाढत असल्याने या अधिकाऱ्यांवर दडपण आहे का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक मोठ्या कारवायांच्या वेळी काही पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. हे दडपण ‘त्या’ प्रकरणापुरतेच होते की कायम या अधिकाऱ्यांना दडपणात ठेवण्यात येते, की हे अधिकारीच आता ‘कुछ कर दिखाना नही’, अशा मानसिकतेतून जात आहे, ते तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, पण... राज्याप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वत:च्या गृहशहराकडेही लक्ष आहे. येथील वातावरण चांगले राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते खास नजर ठेवून असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रचितीही आली. दहशतवादी हल्ला किंवा जातीय दंगलीचा धोका असल्यामुळे त्यांनी नागपूरवर बारीक लक्ष ठेवले होते. येथे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी यांना येथे खास पाठवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असेच लक्ष नेहमी ठेवण्याची गरज आहे. शहरातील निष्क्रिय, भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला, त्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले गेले तरच गुन्हेगारांची पिलावळ वळवळणार नाही. खून, बलात्कार, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करण्यासोबत पत्रकारांवर हल्ले करण्याची, धमकी देण्याची, सामान्यजनांची वाहने जाळण्याची, उद्योजकांवर हल्ले करण्याची गुंड हिंमत करणार नाहीत.येथे मिळाले यश!एकीकडे गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना पोलिसांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे शहरातील चेनस्रॅचिंगच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात नागपुरात चेनस्रॅचर्सनी अक्षरश: हैदोस घातला होता. दरदिवशी किमान दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. परिणामी महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी नियोजनपूर्ण कारवाई केल्यामुळे चेनस्रॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीस प्रशंसेला पात्र ठरतात.