शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

उपराजधानीत राज्य कुणाचे

By admin | Updated: October 7, 2015 03:17 IST

नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी.

क्राईम ग्राफ वाढतोय : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही लोकमत विशेषनागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क असायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्यासारखी झाली आहे. गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव सध्या आजारी रजेवर आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मोलाची भूमिका वठविणारे राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आयुक्तांचा प्रभार आहे. त्यांच्या साथीला शांतपणे कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आहेत. अभिनाशकुमार, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, शैलेश बलकवडे सारखे नव्या दमाचे पोलीस उपायुक्त आहेत. असे असूनही शहरातील गुंड, जुगारी आणि बुकी मोकाट सुटल्यासारखी स्थिती आहे, असे का होत आहे, ते कळायला मार्ग नाही.अधिकारी दडपणात आहे का ? गेल्या दोन दिवसांपासूनं नागपुरात असलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून लोकाभिमुख होऊन काम करावे, असे म्हटले आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा असा सल्ला देतानाच कुणाच्या दडपणात काम करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या सूचनेत अनेक अर्थ दडले आहेत. त्याचमुळे शहरात अनेक चांगले पोलीस अधिकारी असूनही गुन्हेगारी वाढत असल्याने या अधिकाऱ्यांवर दडपण आहे का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक मोठ्या कारवायांच्या वेळी काही पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. हे दडपण ‘त्या’ प्रकरणापुरतेच होते की कायम या अधिकाऱ्यांना दडपणात ठेवण्यात येते, की हे अधिकारीच आता ‘कुछ कर दिखाना नही’, अशा मानसिकतेतून जात आहे, ते तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, पण... राज्याप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वत:च्या गृहशहराकडेही लक्ष आहे. येथील वातावरण चांगले राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते खास नजर ठेवून असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रचितीही आली. दहशतवादी हल्ला किंवा जातीय दंगलीचा धोका असल्यामुळे त्यांनी नागपूरवर बारीक लक्ष ठेवले होते. येथे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी यांना येथे खास पाठवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असेच लक्ष नेहमी ठेवण्याची गरज आहे. शहरातील निष्क्रिय, भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला, त्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले गेले तरच गुन्हेगारांची पिलावळ वळवळणार नाही. खून, बलात्कार, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करण्यासोबत पत्रकारांवर हल्ले करण्याची, धमकी देण्याची, सामान्यजनांची वाहने जाळण्याची, उद्योजकांवर हल्ले करण्याची गुंड हिंमत करणार नाहीत.येथे मिळाले यश!एकीकडे गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना पोलिसांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे शहरातील चेनस्रॅचिंगच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात नागपुरात चेनस्रॅचर्सनी अक्षरश: हैदोस घातला होता. दरदिवशी किमान दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. परिणामी महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी नियोजनपूर्ण कारवाई केल्यामुळे चेनस्रॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीस प्रशंसेला पात्र ठरतात.