शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पुनर्रचना आयोग हे संघाचे षड्यंत्रच

By admin | Updated: April 22, 2016 04:59 IST

देशातील विविध राज्यांमधील विषय परिस्थिती लक्षात घेता राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी

नागपूर : देशातील विविध राज्यांमधील विषय परिस्थिती लक्षात घेता राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विचारवंत मा.गो.वैद्य यांनी केली आहे. मुळात संघाला आता वेगळा विदर्भ नको असून पुनर्रचना आयोगाच्या नावाखाली विदर्भाची निर्मिती पुढे ढकलण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे.वेगळ््या विदर्भाची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या राजीनामा नाट्यानंतर या मागणीने परत जोर धरला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील विदर्भ आंदोलनाची हवा निर्माण झाली आहे. २०१९ पर्यंत विदर्भ वेगळा होईल असा विश्वास अनेक विदर्भवाद्यांना आहे. शिवाय विदर्भाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षातील विदर्भातील अनेक नेतेदेखील आता समर्थनार्थ आले आहेत. अशा स्थितीत राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला तर विदर्भाची निर्मिती आणखी लांबेल, अशी भीती विदर्भवाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.राज्यासाठीचे सर्व निकष विदर्भ पूर्ण करत असल्याचे वेगवेगळ्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता निर्मितीसाठी राजकीय इच्छाशक्तीचीच आवश्यकता आहे. परंतु भाजपा सरकारला या मुद्यावर राजकारण करायचे असून त्यामुळेच संघाच्या माध्यमातून अशा मागण्या समोर करण्यात येत आहेत, असा आरोपदेखील विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)वैद्य यांचे ते वैयक्तिक मतमा.गो.वैद्य यांचे मत हे वैयक्तिक मत असून संघ त्यांच्या विचारांशी सहमत असेलच असे नाही. शिवाय संघातर्फे नियुक्त केलेले पदाधिकारीच भूमिका मांडतात. याअगोदरदेखील हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे, असे संघ मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कुठल्याही आयोगाची आवश्यकता नाहीविदर्भासाठी आतापर्यंत आयोग व समिती यांचे गठन झाले. यातील बहुतांश जणांनी विदर्भ सक्षम आहे व तो व्हायलाच पाहिजे अशी शिफारस केली आहे. भाजपानेदेखील वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचे आश्वासन दिले आहे. मुळात आता कुठल्याही आयोगाची आवश्यकता नाही. गरज आहे ती सकारात्मक कृतीची. मा.गो.वैद्य यांनी केलेली मागणी ही चूक आहे. स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न रेंगाळत ठेवण्यासाठी जाणूनबुजून झालेला हा प्रयत्न आहे. -राम नेवले, मुख्य निमंत्रक,विदर्भ राज्य आंदोलन समितीविदर्भाने वारंवार परीक्षा का द्यावीतीन कोटी लोकसंख्येच्या आकाराची लहान राज्ये असावीत असे संघ व मा.गो.वैद्य यांनी अगोदरदेखील म्हटले आहे. लहान राज्ये निर्माण करण्यासाठी संबंधित प्रदेशांचा विचार केला जातो. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आयोगाने मान्यता दिली आहे. अशा स्थितीत विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी परत राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्याची मागणी करणेच चुकीचे आहे. या मागील कारण राजकीय असले तरी याचा फटका विदर्भाला बसणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच मुद्यावर विदर्भाने परत परत परीक्षा का बरे द्यावी.-डॉ.श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ