शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

राज्य पुनर्रचना आयोग हे संघाचे षड्यंत्रच

By admin | Updated: April 22, 2016 04:59 IST

देशातील विविध राज्यांमधील विषय परिस्थिती लक्षात घेता राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी

नागपूर : देशातील विविध राज्यांमधील विषय परिस्थिती लक्षात घेता राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विचारवंत मा.गो.वैद्य यांनी केली आहे. मुळात संघाला आता वेगळा विदर्भ नको असून पुनर्रचना आयोगाच्या नावाखाली विदर्भाची निर्मिती पुढे ढकलण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे.वेगळ््या विदर्भाची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या राजीनामा नाट्यानंतर या मागणीने परत जोर धरला असून राष्ट्रीय पातळीवरदेखील विदर्भ आंदोलनाची हवा निर्माण झाली आहे. २०१९ पर्यंत विदर्भ वेगळा होईल असा विश्वास अनेक विदर्भवाद्यांना आहे. शिवाय विदर्भाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षातील विदर्भातील अनेक नेतेदेखील आता समर्थनार्थ आले आहेत. अशा स्थितीत राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला तर विदर्भाची निर्मिती आणखी लांबेल, अशी भीती विदर्भवाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.राज्यासाठीचे सर्व निकष विदर्भ पूर्ण करत असल्याचे वेगवेगळ्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आता निर्मितीसाठी राजकीय इच्छाशक्तीचीच आवश्यकता आहे. परंतु भाजपा सरकारला या मुद्यावर राजकारण करायचे असून त्यामुळेच संघाच्या माध्यमातून अशा मागण्या समोर करण्यात येत आहेत, असा आरोपदेखील विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)वैद्य यांचे ते वैयक्तिक मतमा.गो.वैद्य यांचे मत हे वैयक्तिक मत असून संघ त्यांच्या विचारांशी सहमत असेलच असे नाही. शिवाय संघातर्फे नियुक्त केलेले पदाधिकारीच भूमिका मांडतात. याअगोदरदेखील हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे, असे संघ मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कुठल्याही आयोगाची आवश्यकता नाहीविदर्भासाठी आतापर्यंत आयोग व समिती यांचे गठन झाले. यातील बहुतांश जणांनी विदर्भ सक्षम आहे व तो व्हायलाच पाहिजे अशी शिफारस केली आहे. भाजपानेदेखील वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचे आश्वासन दिले आहे. मुळात आता कुठल्याही आयोगाची आवश्यकता नाही. गरज आहे ती सकारात्मक कृतीची. मा.गो.वैद्य यांनी केलेली मागणी ही चूक आहे. स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न रेंगाळत ठेवण्यासाठी जाणूनबुजून झालेला हा प्रयत्न आहे. -राम नेवले, मुख्य निमंत्रक,विदर्भ राज्य आंदोलन समितीविदर्भाने वारंवार परीक्षा का द्यावीतीन कोटी लोकसंख्येच्या आकाराची लहान राज्ये असावीत असे संघ व मा.गो.वैद्य यांनी अगोदरदेखील म्हटले आहे. लहान राज्ये निर्माण करण्यासाठी संबंधित प्रदेशांचा विचार केला जातो. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आयोगाने मान्यता दिली आहे. अशा स्थितीत विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी परत राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्याची मागणी करणेच चुकीचे आहे. या मागील कारण राजकीय असले तरी याचा फटका विदर्भाला बसणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच मुद्यावर विदर्भाने परत परत परीक्षा का बरे द्यावी.-डॉ.श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ