शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये राज्यस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:21 IST

देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस्तरावर ‘व्हीआरडीएल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) चमूने सोमवारी नागपूरच्या मेडिकलची पाहणी केली. पुढील आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे‘आयसीएमआर’कडून पाहणी : अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथेही महाविद्यालयीनस्तरावर प्रयोगशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस्तरावर ‘व्हीआरडीएल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) चमूने सोमवारी नागपूरच्या मेडिकलची पाहणी केली. पुढील आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.चिकनगुनिया, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, मेंदूज्वर, इन्फ्लूएन्झा, झिका यासारखे विषाणूजन्य आजार आता नवीन राहिले नाही. त्या-त्या ऋतूमध्ये ते आढळून येतात. गेल्या वर्षी विदर्भात स्क्रब टायफस व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते तर आता स्वाईन फ्लूची दहशत सुरू आहे. पूर्वी यातील बहुसंख्य विषाणूजन्य संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. परंतु नमुने पाठविण्यापासून ते त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत चार-पाच दिवसांचा कालावधी लागायचा. यावर खर्चही मोठा व्हायचा. दरम्यान, २०१३-१४ मध्ये दोन प्रादेशिक, चार राज्यस्तरीय व देशातील आठ विषाणू प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ही विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा आली. परंतु निधी, आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध न झाल्याने काही चाचण्यांपुरतीच ही प्रयोगशाळा मर्यादित राहिली. गेल्या वर्षी पुन्हा केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळेचे जाळे निर्माण करण्याची योजना आखली. यानुसार महाराष्ट्रात ‘विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा’स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) राज्यस्तरीय प्रयोगशाळा तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयस्तरीय प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. यासाठी सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी ‘आयसीएमआर’चे उपमहासंचालक डॉ. अशोककुमार बग्गा व डॉ. ओम प्रकाश यांच्या द्विसदस्यीय चमूने मेडिकलची पाहणी केली; सोबतच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेतली. राज्यात सुरू होणाऱ्या या प्रयोगशाळेचा खर्च केंद्र शासन उचालणार असून, राज्याला केवळ संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात जागा उपलब्ध करून द्यायची आहे.असा आहे प्रयोगशाळेचा उद्देशसाथ पसरविणाऱ्या विषाणूंचा शोध घेणे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, आजार निदान संच तयार करणे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास करणे, हा या प्रयोगशाळा उभारण्यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयtechnologyतंत्रज्ञान