शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:34 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगृहमंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ संकेतस्थळावर मदतीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ही अप्रत्यक्ष युद्धाचीच स्थिती असून, देशवासीयांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.आपल्या जवानांच्या बलिदानानंतर संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. आपण शांतिपूर्वक वातावरणात राहिलो पाहिजे, यासाठी देशातील प्रत्येक भागात दररोज जवान शहीद होत आहेत.मातृभूमीच्या सुरक्षेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत आम्ही सर्व त्यांच्यासमवेत आहोत. त्यांनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलांचे शिक्षण व देखभालीची जबाबदारी देशवासीयांची आहे. भारत सरकारकडून सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ‘भारत के वीर’ या नावाने संकेतस्थळ व ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात आले व या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत व्यक्तिगतपणे तसेच एकाहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत पोहोचविणे शक्य आहे. संघ स्वयंसेवकांनी अशा प्रसंगात नेहमी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशास्थितीत संघ स्वयंसेवकांसह सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य जाणून मदत केली पाहिजे. तसेच या आव्हानात्मक स्थितीत सर्वांनी एकजूटता, धैर्य व संयम दाखवावे, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला