शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने तिजोऱ्या रिकाम्या केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:08 IST

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोऱ्या रिकाम्या करीत आहे. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये सांकेतिक आंदोलन करणार आहोत. कार्यकर्ते कटोरा घेऊन पैसे गोळा करून सरकारच्या तिजोरीत जमा करणार असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोऱ्या रिकाम्या करीत आहे. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये सांकेतिक आंदोलन करणार आहोत. कार्यकर्ते कटोरा घेऊन पैसे गोळा करून सरकारच्या तिजोरीत जमा करणार असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.ग्रा.पं., नगरपरिषद, नगरपालिका यांच्या खात्यात विकासकामांसाठी पडून असलेला निधी सरकार परत मागत आहे. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या वाहनांसाठी मंजुरी दिली जात आहे. सरकारी बंगल्यांवरील कामे सुरू आहेत. ६० ते ७० आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कामांसाठी विशेष पैसा दिला जात आहे. यापूर्वीच राज्य सरकारने गेल्या सरकारने मंजूर केलेल्या योजनांना ६७ टक्क्यांची कात्री लावून विकासकामांना स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व अखर्चित निधी परत मागितला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मंजूर असलेली विकासकामे ठप्प पडलेली आहेत. जिल्ह्यात जवळपास ३५० कोटी रुपयांच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. पत्रपरिषदेला खासदार डॉ. विकास महात्मे, प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास, आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जि.प.चे विरोधी पक्षनेते अनिल निदान, माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.३०० युनिट प्रति महिना वीज बिल माफ करामहावितरण कंपनी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून तरतूद करून ग्राहकांचे प्रति महिना ३०० युनिट वीज बिल माफ करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी यावेळी केली.कारागृहासाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर उभारावेमध्यवर्ती कारागृह हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. अजूनही कारागृहात १९०० कैदी आहेत. त्यामुळे कारागृहातील कैद्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी गिरीश व्यास यांनी केली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे