शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

आनंद डेकाटे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून या साहित्याला महाराष्ट्रात व देशात ...

आनंद डेकाटे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून या साहित्याला महाराष्ट्रात व देशात इतकेच नव्हे तर परदेशातसुद्धा मोठी मागणी आहे. या साहित्याला प्रचंड विक्रीमूल्य आहे. असे असताना मागील १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित होऊ शकला नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन साहित्याच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ राेजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. गेल्या ४४ वर्षात केवळ २२ खंड व २ सोर्स मटेरियल एवढीच या समितीची कामगिरी राहिली. २००४ पासून साहित्याचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. शेवटचे दोन खंड एक पत्रव्यवहार आणि दुसरा चित्रमय चरित्राचा खंड प्रकाशित केला. परंतु या दोन्ही खंडात इतक्या चुका करण्यात आल्या की, त्यावरून समितीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. प्रकाशित अनेक खंडांच्या पुनर्मुद्रणाचे कामही १६ वर्षांपासून रखडले आहे. १९८१ साली अर्थशास्त्राचा ७०० पानांचा खंड सहा हा इंग्रजी भाषेतील द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जगविख्यात ग्रंथ प्रकाशित झाला. गेल्या ४१ वर्षात या इंग्रजी खंडाचे एकदाही पुनर्मुद्रण करण्यात आले नाही. या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याचा निर्णय झाला. अनुवादाचे हस्तलिखित समितीला सादरही झाले परंतु खंड मात्र प्रकाशित झालेला नाही. नवीन सरकार तरी याकडे लक्ष देईल का? असा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

भाजपच्या काळात ९८ टक्के निधी कपात

साहित्य प्रकाशनासाठी २०१०-१२ या कालावधीत दरवर्षी एक कोटी रुपये मिळाले. २०१३-१६ या कालावधीत ३ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु २०१६-१७ मध्ये केवळ ४४ लाख ८० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. २०१७-१८ मध्ये ४ लाख २० हजार आणि २०१९-२० मध्ये ४ लाख ८० हजार एवढाच निधी मंजूर झाला. म्हणजेच भाजप सरकारने तब्बल ९५ ते ९८ टक्के निधी कपात केला.

बॉक्स

वर्षभरापासून समितीचे कामकाज ठप्प

२७ जानेवारी २०२० रोजी प्रकाशन समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे समितीचे कामकाज ठप्प पडले आहे. समितीची अनुवाद, संपादन आणि प्रकाशनाची कामे, संशोधनाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. तेव्हा प्रलंबित सदस्यांची नेमणूक तातडीने करण्याची गरज आहे.

प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर