शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST

नागपूर : काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना ...

नागपूर : काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असताना महाराष्ट्र वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत वनपर्यटन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. व्याघ्र प्रकल्प असलेल्या जिल्ह्यात काेराेनाची स्थिती सुधारत असल्याने पुढाकार घेतला जात आहे. वनविभागाने व्याघ्र पर्यटन सुरू करण्याची मागणी एनटीसीएकडे केली असून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांनी याबाबतचा प्रस्ताव एनटीसीएचे अतिरिक्त महासंचालक व सदस्य सचिवांना सादर केल्याची माहिती समाेर आली आहे.

मागील वर्षीपासून सुरू झालेल्या काेराेना महामारीमुळे वन्यजीव पर्यटनावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पर्यटन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, गाइड यांच्यात आनंद पसरला आहे. पीसीसीएफ काकाेडकर यांनी ९ जून राेजी एनटीसीएकडे वन्यजीव पर्यटन सुरू करण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे. ‘व्याघ्र प्रकल्पामध्ये सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि काेराेना नियंत्रण नियमांचे पालन करून पर्यटन करणे शक्य आहे. वन्यजीव सफारी करताना प्राण्यांना हाताळण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे मानवाकडून प्राण्यांमध्ये काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पर्यटनाला परवानगी देण्यास हरकत नाही’, असा विश्वास पीसीसीएफ यांनी पत्रात नमूद केला आहे.

राज्य शासनाच्या ४ जूनच्या निर्देशानुसार ‘ब्रेकिंग द चेन’अंतर्गत नियमावली केली आहे. शासनाने पाॅझिटिव्हिटी दर, रुग्णांची टक्केवारी व ऑक्सिजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची विभागणी केली आहे. त्यानुसार, विदर्भातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प या नियमावलीतून सुटतात. व्याघ्र प्रकल्प असलेले जिल्हे लेव्हल-१ ते लेव्हल-३ च्या कॅटेगरीत आहेत. या कॅटेगरीमध्ये असलेल्या जिल्ह्यात सर्व दुकाने, रेस्टाॅरंट, चित्रपटगृह, माॅल्स आदी नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्य वन्यजीव अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार व्याघ्र प्रकल्पांचे पर्यटन बंद असल्याने जिप्सीचालक, गाइड्स, हाॅटेल व्यवसायाशी जुळलेल्या कामगारांचा राेजगारावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने पर्यटन सुरू करण्याची गरज असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.

लाेकमतशी बाेलताना नितीन काकाेडकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणात पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते. त्यामुळे वनविभागाने एनटीसीएला राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या पर्यटनाबाबत दिलेल्या निर्देशांवर पुन्हा विचार करून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. यानंतर ३० जूनपर्यंतच जंगलाच्या काेर एरियात पर्यटन केले जाऊ शकेल आणि पावसाळ्यामुळे २ जुलैपासून पुन्हा ते बंद करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता लवकर पर्यटनाला परवानगी देण्याची व नवीन परिपत्रक काढण्याची विनंती केली असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.