शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST

नागपूर : काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना ...

नागपूर : काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असताना महाराष्ट्र वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत वनपर्यटन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. व्याघ्र प्रकल्प असलेल्या जिल्ह्यात काेराेनाची स्थिती सुधारत असल्याने पुढाकार घेतला जात आहे. वनविभागाने व्याघ्र पर्यटन सुरू करण्याची मागणी एनटीसीएकडे केली असून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांनी याबाबतचा प्रस्ताव एनटीसीएचे अतिरिक्त महासंचालक व सदस्य सचिवांना सादर केल्याची माहिती समाेर आली आहे.

मागील वर्षीपासून सुरू झालेल्या काेराेना महामारीमुळे वन्यजीव पर्यटनावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पर्यटन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, गाइड यांच्यात आनंद पसरला आहे. पीसीसीएफ काकाेडकर यांनी ९ जून राेजी एनटीसीएकडे वन्यजीव पर्यटन सुरू करण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे. ‘व्याघ्र प्रकल्पामध्ये सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि काेराेना नियंत्रण नियमांचे पालन करून पर्यटन करणे शक्य आहे. वन्यजीव सफारी करताना प्राण्यांना हाताळण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे मानवाकडून प्राण्यांमध्ये काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पर्यटनाला परवानगी देण्यास हरकत नाही’, असा विश्वास पीसीसीएफ यांनी पत्रात नमूद केला आहे.

राज्य शासनाच्या ४ जूनच्या निर्देशानुसार ‘ब्रेकिंग द चेन’अंतर्गत नियमावली केली आहे. शासनाने पाॅझिटिव्हिटी दर, रुग्णांची टक्केवारी व ऑक्सिजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची विभागणी केली आहे. त्यानुसार, विदर्भातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प या नियमावलीतून सुटतात. व्याघ्र प्रकल्प असलेले जिल्हे लेव्हल-१ ते लेव्हल-३ च्या कॅटेगरीत आहेत. या कॅटेगरीमध्ये असलेल्या जिल्ह्यात सर्व दुकाने, रेस्टाॅरंट, चित्रपटगृह, माॅल्स आदी नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्य वन्यजीव अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार व्याघ्र प्रकल्पांचे पर्यटन बंद असल्याने जिप्सीचालक, गाइड्स, हाॅटेल व्यवसायाशी जुळलेल्या कामगारांचा राेजगारावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने पर्यटन सुरू करण्याची गरज असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.

लाेकमतशी बाेलताना नितीन काकाेडकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणात पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते. त्यामुळे वनविभागाने एनटीसीएला राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या पर्यटनाबाबत दिलेल्या निर्देशांवर पुन्हा विचार करून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. यानंतर ३० जूनपर्यंतच जंगलाच्या काेर एरियात पर्यटन केले जाऊ शकेल आणि पावसाळ्यामुळे २ जुलैपासून पुन्हा ते बंद करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता लवकर पर्यटनाला परवानगी देण्याची व नवीन परिपत्रक काढण्याची विनंती केली असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.