रेवराल : रामटेक बसस्थानकाहून रामटेक-माैदा मार्गे जाणारी सकाळी ८.३० वाजताची तसेच माैदा ते रामटेक मार्गे सकाळी ८ वाजताची बसफेरी काेराेनामुळे बंद करण्यात आली. सध्या काेराेना रुग्णसंख्या ओसरली असताना या बसफेऱ्या सुरू केलेल्या नाही. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांची प्रवासासाठी माेठी अडचण हाेते. त्यामुळे ही बसफेरी सुरू करा, या मागणीचे निवेदन राेशन मेश्राम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना दिले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने माैदा तालुक्यात मर्यादित बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. परंतु तालुक्यातील सर्वच भागात एसटीची सेवा मिळत नसल्याने गावकऱ्यांची गैरसाेय हाेते. रामटेक ते माैदा आणि माैदा ते रामटेक या मार्गावरील नगरधन, नंदापुरी, नेरला, चाचेर, आष्टी, तारसा, बाबदेव व परिसरातील गावांसाठी सकाळची बसफेरी बंद असून, नाेकरदार, गाेरगरीब मजूर, आराेग्य सुविधा, शासकीय कार्यालयातील कामे तसेच विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता मनस्ताप हाेताे. शिवाय कामाच्या ठिकाणी वेळेत पाेहाेचण्यासाठी प्रवाशांना अधिकचा भुर्दंड साेसावा लागत आहे. त्यामुळे रामटेक-माैदा मार्गावरील सकाळची बसफेरी तातडीने सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मनाेहर भिवगडे, हर्षल चाेपकर, शुभम भगत, आनंद चाेपकर, साैरभ चाेपकर, आकाश कारेमाेरे आदी उपस्थित हाेते.
250821\1740-img-20210825-wa0034.jpg
सकाळची बससेवा कधी सुरू होणार? फोटो